मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना (12 MLAs of BJP susupended) विधानसभेतून वर्षभरासाठी निलंबित केल्यानंतर वेगळ्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी झाल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चोवीस तासांच्या आत नोटीस देऊन ही निवडणूक घेता येत असल्याने त्यासाठी महाआघाडी सरकारमधील चाणक्य आता कामाला लागले आहेत. (Monsoon session of Maharashtra Assembly)
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हीप लागू होत नाही. तसेच मतदानही गोपनीय पद्धतीने होते. त्यामुळे ही निवडणूक घेताना महाविकास आघाडीच्या मनात धाकधूक होती. अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका ठरविताना ही निवडणूक घेण्याचे नियोजन नव्हते. मात्र आता विधानसभेतील भाजपचे बळ हे 106 वरून बाराने कमी झाली आहे. या निलंबनानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीसाठी ही परिस्थिती अनुकूल असल्याचे मानले जात आहे.
काॅंग्रेस या निवडणुकीसाठी आग्रही आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीतील नेत्यांची बैठक झाली. काॅंग्रेस जे नाव देईल, ते मंजूर करण्याचे ठरले आहे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर यांच्या नावाची चर्चा आहे. अजून काॅंग्रेसने आपले नाव निश्चित केलेले नाही. पण सध्याची सभागृहातील परिस्थिती पाहता काॅंग्रेसही वेगाने हालचाल करून पक्षश्रेष्ठींकडून नावास संमती आणेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
पक्षनिहाय आमदारांची संख्या
महाविकास आघाडी सरकारने आपला विश्वासदर्शक ठराव हा 172 मते मिळवून मंजूर करून घेतला होता. त्यामुळे `मॅजिक फिगर`145 पेक्षा अधिक मते महाविकास आघाडीकडे सध्या तरी आहेत. काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मिळूनच संख्या ही 152 होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बहुमताबाबत निश्चिंत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.