सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच, अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या बाबती भूमिका घेतली आहे. दोन्ही मित्रपक्षांशी चर्चा करुन यावर निर्णय घेतला जाईल, असेही सत्तार यांनी सांगितले.
Abdul Sattar
Abdul Sattar

पुणे : राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही. तर, कमी केल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. ते आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

औरंगाबादच्या नामांतराला आपले समर्थन असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या बाबती भूमिका घेतली आहे. दोन्ही मित्रपक्षांशी चर्चा करुन यावर निर्णय घेतला जाईल, असेही सत्तार यांनी सांगितले.

त्याचबरोबर मुस्लिम बांधवांवर उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला नाही, कोरोनाच्या काळात इतर देशांत जास्त संक्रमण पण भारतात कमी, अल्ला ताला मुळे कोरोनाची महामारी कमी झाली असा, विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

...तरच टोपी काढणार 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पाडल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेत रावसाहेब दानवे यांनी धोका दिल्याचा आरोप सत्तार यांनी केलाय. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जागा दाखवून दिल्याचे सत्तार म्हणाले. मी पुन्हा येईल. जे 'पुन्हा येईल बोलले होते ते आलेच नाही', पण मी पुन्हा येणार आहे, असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला. 

हे देखिल वाचा - 

औरंगजेब आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही

औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. आता तर आपण शिवाजी महाराजांच्याच पक्षात आलो आहे. समाजात तेढ निर्माण होण्यासाठी काही लोक पुड्या सोडतात, असेही सत्तार म्हणाले. त्याचबरोबर अजिंठा इथे शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधत आहे. त्याचे काम जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील यांनी गीता आणि कुराण वाचावे

चंद्रकांत पाटील यांनी कुराण आणि गीता वाचावी, म्हणजे त्यांना समजेल, पाटील यांना झोपेत कुणी आदेश देतात का बघावे लागेल. आज ज्या बांधवांना कुराण दिले ते चंद्रकांत पाटील यांना देतील. आज जी भांडणे देशात चाललीय ती भविष्यात घडणार नाही, अशी आशा सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com