निवडणुका जीवापेक्षा मोठ्या नाहीत - अतुल सावे

कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वच निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा राज्य सरकार व निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच आहे.- अतुल सावे, भाजपचे आमदार तथा महापालिका निवडणुक प्रमुख
कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वच निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा राज्य सरकार व निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच आहे असे म्हणत भाजपचे आमदार तथा महापालिका निवडणुक प्रमुख अतुल सावे यांनी देखील या निर्णयाचे समर्थन केले आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वच निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा राज्य सरकार व निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच आहे असे म्हणत भाजपचे आमदार तथा महापालिका निवडणुक प्रमुख अतुल सावे यांनी देखील या निर्णयाचे समर्थन केले आहे.

औरंगाबादः महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय हा एका विशिष्ट परिस्थितीत घेण्यात आला आहे, हा काही राजकीय निर्णय नाही. आणि कुठलीही निवडणूक ही माणसाच्या जीवापेक्षा मोठी नसते, त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वच निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा राज्य सरकार व निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच आहे असे म्हणत भाजपचे आमदार तथा महापालिका निवडणुक प्रमुख अतुल सावे यांनी देखील या निर्णयाचे समर्थन केले आहे.

एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी भाजपने सुरू केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेली पंचवीस वर्ष महापालिकेत शिवसेनेसोबत सत्तेत बसलेल्या भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.

भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असणाऱ्यांची संख्या देखील इतर राजकीय पक्षांपेक्षा अधिक होती. परंतु कोरोनाचा विळखा, पॉझीटीव्ह आणि संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत.

या निर्णया संदर्भात भाजप आमदार अतुल सावे म्हणाले, राज्यात सध्या आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सगळ्याच यंत्रणा झपाटून कामाला लागल्या आहेत. अशावेळी निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे.

राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील सरकारच्या सोबत आहोत. निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय जनतेच्या आरोग्याचा काळजी पोटी घेण्यात आलेला आहे, हा काही राजकीय निर्णय नाही हे आधी लक्षात घेतले पाहिजे.

निवडणुका येतील, जातील पण ज्यांसाठी निवडणुका लढवायच्या आहेत त्या जनतेचा जीव सर्वात महत्वाचा आहे. कुठलीही निवडणूक ही कुणाच्या जीवापेक्षा मोठी नाही याचा पुनरुच्चार देखील अतुल सावे यांनी केला. 

निवडणुकीची तयारी काय, पुन्हा करता येईल, पण अशा वातावरणात निवडणुका घेतल्या आणि त्यातून काही विपरित घडल तर मात्र ते नुकसान कधीच भरून निघणार नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय योग्य आणि सर्वमान्य असाच असल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com