आजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांसाठी होता?

सदाभाऊ खोत यांनी टि्वट करुन पवारांवर निशाणा साधला आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-29T144940.378.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-29T144940.378.jpg

पुणे : राज्यातील पुरग्रस्तांसाठी विविध पातळीवरुन मदतीचा ओघ सुरु झाला आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दैारे करीत आहे. ''मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य नाही. ज्यांचा त्या भागात संबंध नाही त्यांनी दौरे टाळावेत, कारण नसताना दौरे करुन, अडचण निर्माण करुन नये. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार rohit pawar यांनी महाड येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. खोत यांनी टि्वट करुन पवारांवर निशाणा साधला आहे. 

शिवसेनेचं अखेर ठरलं! स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा!
आपल्या टि्वटमध्ये सदाभाऊ खोत म्हणतात की, आजोबांनी सांगितले...राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत. आजोबांच्या सल्ल्याला नातवाच मान नाही आणि जामखेडचे आमदार चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसां करिता होता?

फोन टॅप करण्याची परवानगी राज्य सरकारनेच दिली ; शुक्लांचा गौप्यस्फोट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, ''नेत्यांनी शासकीय यंत्रणेवर ताण पडणार नाही असे दौरे करावेत, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.  पवाराचा सल्ला योग्यच आहे. आम्ही गेल्यामुळे शासकीय यंत्रणा जागी होते. विरोधी पक्षनेता म्हणून मी दौरा करणार आहे.''  रोहित पवारांनी नुकताच कोकणचा दैारा केला आहे. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. 

रोहित पवार आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात ...
पूरग्रस्तांना मदतीचा हात देणं, त्यांना धीर देणं आणि त्यांचे उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करणं ही राज्याचे नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपल्या राज्याची संस्कृतीही आहेच. पवार कुटुंबातील सदस्य म्हणून माझ्यावर तर लहानपणापासूनच असे संस्कार झाले आहेत. त्यामुळं जिथं कुठं गरज लागेल तिथं जमेल तशी मदत करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यापुढंही तो कायम राहील. 

राज्य सरकार यासाठी काम करतंच आहे, पण यापैकी केंद्र सरकारकडून जे अर्थसाह्य किंवा इतर मदत लागेल याबाबत आदरणीय पवार साहेब हेही प्रयत्न करत आहेत. त्यामुळं पूरग्रस्त नागरिकांनी याबाबत चिंता करू नये. आज संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. नुकसानीचं प्रमाण प्रचंड मोठं असल्याने केंद्र सरकारचीही मदत लागणार आहे आणि अशी मदत निश्चित मिळेल, असा विश्वास आहे!
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com