शरद पवार-अमित शहा भेटीवर अमृता फडणवीस म्हणाल्या....

राज्यपाल कोशियारी यांच्यासारखा निष्ठावान आणि कर्तृत्ववान माणूस मी पाहिलेला नाही.
On Sharad Pawar-Amit Shah meeting, Amruta Fadnavis said
On Sharad Pawar-Amit Shah meeting, Amruta Fadnavis said

पुणे  ः जे नेते दिल्लीत सध्या भेटत आहेत, ते आधीपासून एकमेकांना भेटत आहेत. असं नाही की ते अचानक आताच भेटत आहेत, त्यामुळे त्यावरून सरकार स्थापनेबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही. पण, हे खरे आहे की राज्यातील महाविकास आघाडीचे जे सरकार आहे, ते अत्यंत कुमकवत आहे. ते कधी पडते आणि कधी नाही, याचा ध्यास प्रत्येकाला लागलेला आहे. महाविकास आघाडी सरकार पडले तर भारतीय जनता पक्ष एक चांगला पर्याय देईल, असे त्यांनी सांगितले आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात बोलताना केले. (On Sharad Pawar-Amit Shah meeting, Amruta Fadnavis said ...)

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या अमृता फडणवीस या पत्रकारांशी बोलत होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटले. दिल्लीतील गाठीभेटीवरून तुम्हाला वाटतं का की राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि भाजपचे सरकार सत्तेवर येईल. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून टीका केली जात आहे, त्याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज्यपाल कोशियारी यांच्यासारखा निष्ठावान आणि कर्तृत्ववान माणूस मी पाहिलेला नाही. राज्य सरकारकडून राज्यपालांना होणारा विरोध हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. सरकारच्या मागण्या राज्यपाल कोशियारी यांच्याकडून पूर्ण होत नसल्याने बहुतेक ते या माध्यमातून राज्यपालांवर राग व्यक्त करत असतील. पण, राज्यपालांसारख्या व्यक्तीवर टीका व्हायला नको, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी नाही, त्यामुळे भाजप अजित पवारांबरोबर पुन्हा जाऊन सरकार बनविणार का, यावर काहीसे मजेशीर उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले. त्या म्हणाल्या की, मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा करते आणि त्यानंतर तुम्हाला कळविते.

पुण्यातील मेट्रोवरून सुरू असलेल्या श्रेयवादावर फडणवीस म्हणाल्या की, असंच होतं, कामं कोणी करतं आणि हार कोणीतरी दुसरंच घालून जातं. पूरग्रस्तांना दिलेले पॅकेज पुरसे आहे का, या प्रश्नावरूनही त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की या पॅकेजमध्ये महावसुली नसेल, तर निधी संबंधितांपर्यंत उपलब्ध व्हायला हवा. महावसुली असेल तर काही सांगू शकत नाही.

आगामी गणेश चर्तुथीच्या आधी माझे गाणे येणार आहे, अशी माहितीही अमृता फडणवीस यांनी पुण्यात बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com