मुलीनंतर अवघ्या चार दिवसांत वडिलांनीही घेतली राज्यपालांची भेट

पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्याराज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची चार दिवसांपूर्वी अंकिता पाटील यांनी भेट घेतली होती.
Former Minister Harshvardhan Patil meet to Governor
Former Minister Harshvardhan Patil meet to Governor

इंदापूर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भेटींचा सिलासिला कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या कायम भेटीगाठी घेत आहेत. केवळ पाटील हेच नव्हे; तर त्यांच्या कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकित पाटील ह्याही भाजप नेत्यांना भेटत आहेत. पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची चार दिवसांपूर्वी अंकिता पाटील यांनी भेट घेतली होती, त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत हर्षवर्धन पाटील यांनी कोशियारी यांची भेट घेतली. (Former Minister Harshvardhan Patil meet to Governor)

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत राज्यपाल कोशियारी यांच्या, तर दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे. मागील आठवड्यातच हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतली होती. नव्या सहकार मंत्रालयाबाबत शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी पुण्यात राज्यपाल कोशियारी यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगितले होते.

दरम्यान, मुलीच्या भेटीनंतर अवघ्या चार दिवसानंतर हर्षवर्धन पाटील हे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना मुंबईत भेटले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तथा नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील होते. पाटील कुटुंबीयांच्या भाजप नेत्यांशी वाढलेल्या गाठीभेटी आणि आगामी निवडणुका पाहता त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा इंदापूर तालुक्यात पुन्हा सुरू झाली आहे. 

दरम्यान, आपल्या राज्यपालांसोबतच्या भेटीबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मुंबईत राजभवनात राज्यपालांची सदिच्छा भेट घेवून शेतकऱ्यांची वीजजोड तोडणी तसेच विद्यार्थी प्रवेश या संवेदनशील विषयांवर चर्चा केली. राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित करण्याची मोहीम महाविकास आघाडी सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सध्या ते वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे सरकारने सुरू केलेली कृषीपंपांची वीजजोड तोडणी मोहिम तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. 

राज्यात वाढलेल्या गुणांमुळे सध्या इयत्ता अकरावी व प्रथम वर्ष पदवीचा प्रवेश प्रश्न जटील बनल्याने विद्यार्थी चिंतेत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, अशी विनंती राज्यपाल यांना केली असता त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com