फक्त याच वारकऱ्यांना मिळणार सरकारकडून मदत...

फड प्रमुखांना कायम स्वरूपी दरमहा तीस हजार रूपये मानधन मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Varkari 2.jpg
Varkari 2.jpg

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये वारकऱ्यांना सरकारकडून कोरोना काळात आर्थीक मदत मिळावी अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने (Warkari Sahitya Parishad) राज्य सरकारकडे केली होती. याबाबत मुंबई येथील विधान भवनात  सांस्कृतिक कार्य विभाग व वारकरी साहित्य परिषद यांची बैठकी पार पडली. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी परिषदेच्या मागण्या मान्य केल्या.

वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संतपीठ उभे राहावे, या प्रमुख मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सरकारकडे केल्या होत्या. ह्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे यांच्यासह परिषदेचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

याच वारकऱ्यांना  मिळणार मदत...

पंढरपूर येथील फड परंपरेचे प्रमुख यांनी निवड केलेल्या वारकरी संप्रदायातील किर्तनकार, भारूडकार, पखवाज वादक, गायक यांना दरमहा पाच हजार रूपये मदत कोरोना काळ असेपर्यंत मिळणार आहे. तर फड प्रमुखांना कायम स्वरूपी दरमहा तीस हजार रूपये मदत मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले, असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. मदतीसाठी निवड करण्यात येत असलेल्या किर्तनकार, भारूडकार, पखवाज वादक, गायक यांची राज्यातील संख्या सुमारे पाच हजारापर्यंत असून फड प्रमुखांची संख्या ७० ते ७२ आहे. 

दरम्यान, भाजपकडून राज्यातील मंदिरे उघडा, या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना वारकऱ्यांनी मात्र मंदिरे उघडण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे. ‘जळी स्थळी काष्टी पाषाणी’ असे म्हणत परमेश्वर प्रत्येक माणसात आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवाशी खेळू नका; अन्यथा वारकरीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पाटील यांनी या वेळी दिला. कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना महिन्याला सरकारकडून पाच हजार रुपये मदत मिळणार आहे. विधान भवनात काल झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही घोषणा केली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
 
कोरोना काळाच्या ओघात संतपीठ ही संकल्पना बाजूला गेली होती; पण वारकरी साहित्य परिषदेच्या रूपाने या विषयाला बळ मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्याबाबत आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन या वेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. वारकऱ्यांना मानधन देण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन वारकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील, असेही थोरात यांनी सांगितले.

Edited By : Vishnu Sanap
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com