वारकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

वारकऱ्यांना महिन्याला सरकारकडून पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे.
30alandi2.jpg
30alandi2.jpg

मुंबई : महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग व वारकरी साहित्य परिषद Warkari Sahitya Parishad यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या विधान भवनात आयोजित बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संतपीठ उभे राहावे, या प्रमुख मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मान्य केल्या आहेत. वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख Amit Deshmukhयांनी केली.

राज्यातील मंदिरे उघडा, या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना वारकऱ्यांनी मात्र मंदिरे उघडण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे. ‘जळी स्थळी काष्टी पाषाणी’ असे म्हणत परमेश्वर प्रत्येक माणसात आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवाशी खेळू नका; अन्यथा वारकरीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या वेळी दिला. कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना महिन्याला सरकारकडून पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे. आज विधान भवनात झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही घोषणा केली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
 
डिस्को, बार, आरोग्य केंद्र आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 
कोरोना काळाच्या ओघात संतपीठ ही संकल्पना बाजूला गेली होती; पण वारकरी साहित्य परिषदेच्या रूपाने या विषयाला बळ मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्याबाबत आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन या वेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. वारकऱ्यांना मानधन देण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन वारकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील, असेही थोरात यांनी सांगितले.

व्यसनमुक्तीसाठी मोठमोठे ब्रँड ॲम्बेसिडर आणून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो ; मात्र आपल्या जगण्या-वागण्यातून माणुसकीची शिकवण देत समाजाला दिशा देण्याचे काम करणारे वारकरी खरे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली. महाविकास आघाडी सरकार सतत वारकऱ्यांसोबत राहील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. बैठकीला वारकरी परिषदेचे राज्यभरातील सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com