वारं कुठं वाहतंय..याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात.... 

लोकांना गृहीत धरुन चालणार नाही, कारण माणच्या जनतेच्या मनात काय आहे हे सहजासहजी समजत नाही. अत्यंत सावध पावलं टाकून ही निवडणूक लढवावी लागेल.
I am in Maan taluka to guess where the wind is blowing says Sabhapati Ramraje Nimbalkar
I am in Maan taluka to guess where the wind is blowing says Sabhapati Ramraje Nimbalkar

दहिवडी : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. जिंकायच्या दृष्टीने काय करावं लागेल अन वारं कुठं वाहतंय याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात आलोय, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. I am in Maan taluka to guess where the wind is blowing says Sabhapati Ramraje Nimbalkar

दहिवडी (ता. माण) येथे बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित राष्ट्रवादीच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, उपसभापती तानाजी कट्टे, पंचायत समिती सदस्य नितीन राजगे, अभयसिंह जगताप, सुनिल पोळ, कविता म्हेत्रे, युवराज सुर्यवंशी, श्रीराम पाटील, विनय पोळ, तानाजी मगर, बाबूराव काटकर, जयप्रकाश कट्टे उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, पुढील विधानसभेला तोंड देण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत. त्यामुळे राजकारणात आपलं मुळ पक्कं करण्यासाठी या निवडणूका आहेत. ही मर्यादित मतांची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. लोकांना गृहीत धरुन चालणार नाही, कारण माणच्या जनतेच्या मनात काय आहे हे सहजासहजी समजत नाही. अत्यंत सावध पावलं टाकून ही निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मान खाली घालावी लागेल, अशी तडजोड होणार नाही. 

सुनील माने म्हणाले, तात्यांनी सामान्य कार्यकर्ता सत्तेत असला पाहिजे यासाठी त्याला नेहमीच ताकद दिली. राजकारणात सत्तेच्या समीकरणापेक्षा कार्यकर्त्यांचं बळ महत्वाचं असतं अन ते राष्ट्रवादीकडे आहे. आपला नंबर एकचा शत्रू भाजप आहे, हे बघून 'आमचं ठरलंय' टिमला बरोबर घेवून जाण्याची भूमिका आपली असली पाहिजे. पण त्याचवेळी आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान कमी होणार नाही. याची आपण दक्षता घेणार आहोत. पक्षाचे काम न करता नेत्यांच्या कानाला लागणाऱ्या कार्यकर्त्यांचे लाड यापुढे पुरविले जाणार नाहीत. 

प्रभाकर देशमुख म्हणाले, बाजार समितीची निवडणूक फक्त लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. त्यासाठी जे करावे लागेल ते करायची आपली तयारी आहे. आपण एकत्र असलो तर विजय निश्चित आहे याची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकीत आपण घेतली आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. या निवडणुकीबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. यावेळी श्रीराम पाटील, अंगराज कट्टे, चव्हाण गुरुजी, सूर्याजी जगदाळे, विजय जगताप, संजय जगताप, दादासाहेब चोपडे यांनी कार्यकर्त्यांच्यावतीने आपली मते मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com