जयंतराव आमची लोकशाही एवढी कमकुवत नाही; तपास यंत्रणांवरून भातखळकरांचा टोला

बिनबुडाचे आरोप करून केवळ जनतेला घाबरवणे आणि भाजपविरुद्ध तसेच तपासयंत्रणांविरुद्ध लोकांचे मन कलुषित करणे हाच संबंधितांचा हेतू आहे
Jayantrao Our democracy is not so weak says MLA Atul Bhatkhalkar
Jayantrao Our democracy is not so weak says MLA Atul Bhatkhalkar

मुंबई : चार तपासी अधिकारी कोणाची तरी चौकशी करून देशाची लोकशाही कमकुवत करतील, अशी आमची लुटुपुटूची लोकशाही नाही. देशावर आणीबाणी लादून लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना यासंदर्भातील त्यांचा अनुभव विचारा, असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांना लगावला आहे. 

तपाससंस्थाकडून अटकेतील आरोपींकडून काहीतरी वदवून घेण्याचा आणि त्याआधारे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा नवा प्रकार देशात भाजपने सुरु केला आहे, असा दावा पाटील यांनी नुकताच नांदेड येथे केला होता. आरोपांची भीती दाखवत राजकारणावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे देशातील लोकशाही संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त करणारे विधान श्री. पाटील यांनी यावेळी केले होते.

केंद्र सरकारच्या तपाससंस्था असेच घाबरवण्याचे काम करीत राहिल्या तर देशातील लोकशाहीला सुरुंग लागेल, असाही आरोप त्यांनी केला होता. त्याला आमदार श्री. भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दोन-चार अधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षातील कोणत्याही माजी मंत्र्याची चौकशी केली म्हणून त्या पक्षातील इतरांना दरदरून घाम फुटणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे देशातील लोकशाहीच धोक्यात येईल, असा राईचा पर्वत त्यांनी करू नये.

मुळात असे बिनबुडाचे आरोप करून केवळ जनतेला घाबरवणे आणि भाजपविरुद्ध तसेच तपासयंत्रणांविरुद्ध लोकांचे मन कलुषित करणे हाच संबंधितांचा हेतू आहे. आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या तपासयंत्रणांशी बादरायण संबंध जोडून असे आरोप करणाऱ्यांचे हेतूच अप्रामाणिक आहेत. 'कर नाही त्याला डर कशाला' हे ध्यानात ठेऊन संबंधितांना अशा चौकशांमुळे घाबरायचे काहीच कारण नाही. 

पण, खाई त्याला खवखवे अशी अनेकांची अवस्था झाली असल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो, हे कोणीही सहज समजू शकतो, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. पण अशा स्थितीत कोणी तपासयंत्रणांवर टीका केली तर एकवेळ ठीक आहे. तपासयंत्रणांचा राग भाजपवर काढला तरीही चालू शकते. पण तपासयंत्रणांमुळे थेट लोकशाहीच कमकुवत होईल, असा आरोप करणे म्हणजे आरोपकर्त्यांना लोकशाही समजलीच नाही हे स्पष्ट आहे.

लोकशाहीला नख लावण्याचा प्रयोग काँग्रेसने आणिबाणी लादून केला होता. मात्र तो यशस्वी झाला का, हे जयंतरावांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना विचारून पहावे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करण्यास 132 कोटी जनता, न्याययंत्रणा, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, साहित्यिक इ. समर्थ आहेत. त्यामुळे लोकशाही कमकुवत होईल ही भीती कोणीही जनतेला दाखवू नये, असेही भातखळकर यांनी बजावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com