पालघरप्रकरणी सरकारने राजीनामा द्यावा म्हणणे योग्य नाही : शरद पवार 

प्रशासन यंत्रणेवर मला पुर्ण विश्वास आहे. महाराष्टावर अशी अनेकदा संकटे आली. त्यावेळी प्रशासकिय यंत्रणा कशी काम करते हे मी स्वतः पाहिले आहे.
FB Live
FB Live

सातारा : पालघर येथे घडलेल्या प्रकाराचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. पण या घटनेनंतर लगेचच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था वाईट स्थितीला गेल्याचे दाखविले जात आहे. गैरसमजूतीतून घडलेला या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून सरकारने राजीनामा द्यावा म्हणणे योग्य नाही. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी मागणी करण्याची आजची ती वेळ नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी विरोधकांना लगावला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

श्री. पवार म्हणाले,  पालघरच्या घटनेनंतर लगेचच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था वाईट स्थितीला गेल्याचे दाखविले जात आहे. मुळात या घटनेचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. याची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणुक केलेली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी शंभर लोकांना अटक करून जेलमध्ये ठेवले आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे.


ही घटना घडल्यानंतर काही तासातच राज्य सरकार व पोलिसांनी खबरदारी घेतली. दुसऱ्या दिवशीच या घटनेशी संबंधित लोकांना अटक केली. मुळात तेथे जे घडले ते चांगले नाही, ते घडायला नको होते. गैरसमजूतीतून हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली म्हणून सरकारने राजीनामा द्यावा म्हणणे योग्य नाही. कारण आजची ही वेळ नाही.

सध्या कोरेनाच्या परिस्थितीला तोंड देणे आवश्यक आहे. या सर्व संकटांशी तोंड देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिलेली नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आज पोलिस अहोरात्र काम करत आहेत. वैद्यकिय क्षेत्रासह शासकिय कार्यालयतील कर्मचारी जीवावर उदार होऊन कामावर येत आहेत.

देशाची, राज्याची स्थिती सावरून त्यांच्याविषयी आत्मियता दाखवून त्यांच्या कुटुंबियांची काळजी वाढणार नाही, याची आपण सर्वांनी खबरदारी घेऊया. याबाबत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, हे दाखविणे गरजेचे आहे. प्रशासन यंत्रणेवर मला पुर्ण विश्वास आहे. महाराष्टावर अशी अनेकदा संकटे आली. त्यावेळी प्रशासकिय यंत्रणा कशी काम करते हे मी स्वतः पाहिले आहे.

मी मुख्यमंत्री असताना लातूरचा भुकंप, मूंबईवरील हल्ला अशा वेळी प्रशासन यंत्रणा
अल्पावधित परिस्थिती नॉरमल करते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. या सगळ्याचा प्रयत्नाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे,  अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली. 

.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com