मोठी बातमी : आजपासून जुनी वाहने भंगारात! मोदींनी लागू केलं नवीन धोरण

भारताच्या विकासाच्या वाटचालीत हा मैलाचा टप्पा ठरेल, असा विश्वास मोदींना या वेळी व्यक्त केला.
prime minister narendra modi luanches vehicle scrapping policy
prime minister narendra modi luanches vehicle scrapping policy

नवी दिल्ली : जुनी वाहने भंगारात काढण्याच्या (Vehicle Scrapping Policy) धोरणाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली. भारताच्या विकासाच्या वाटचालीत हा मैलाचा टप्पा ठरेल, असा विश्वास मोदींना या वेळी व्यक्त केला. तरुणांनी स्टार्टअपच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आजपासून जुनी वाहने भंगारात काढण्याचे धोरण लागू होत आहे. भारताच्या विकासाच्या वाटचालीत हे अतिशय महत्वाचे पाऊल ठरणार आहे. वाहने भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गुजरातमध्ये गुंतवणूकदार परिषद होत आहे. यातून अनेक पर्याय समोर येतील. तरुणांनी स्टार्टअपच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी व्हावे.

अनफिट आणि प्रदूषण करणारी वाहने पर्यावरणपूरक पद्धतीने वापरातून काढून टाकण्याचे हे धोरण आहे. या अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनफिट आणि प्रदूषण करणारी वाहने वापरातून काढून टाकली जातील. आमचा उद्देश हा सर्वांनाच पाठबळ देण्याचा असून, यातील भागधारकांनी यातून मूल्य मिळेल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे मोदींनी नमूद केले. 

जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणांतर्गत अनफिट आणि प्रदूषण करणारी वाहने पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने वापरातून रद्द केली जातील. ही वाहने भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यात ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स आणि नोंदणीकृती वाहने भंगार सुविधा उभारल्या जातील.  

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार म्हणून वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले होते. अर्थमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल देताच 15 ते 20 वर्षे जुन्या वाहनांना भंगारमध्ये काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करू, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.

काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी?
या धोरणानुसार 51 लाख छोटी वाहने स्क्रॅप होतील. 17 लाख मध्यम वाहनांचेही रिसायकलिंग होईल. यामुळे 23 ते 25 टक्के प्रदूषण कमी होईल. नवी वाहने रस्त्यावर येतील. जुन्या वाहनांचे स्टील, इतर धातू, रबर याचा पुनर्वापर करण्यावर भर आहे. या धोरणामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक जगात उंचावेल, असे सरकारचे म्हणणे आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com