नाना पटोलेंना दिल्लीत बोलावून हाय कमांडच्या कानपिचक्या!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना स्वबळाची भाषा महागात पडली आहे.
congress leadership slams state party president nana patole
congress leadership slams state party president nana patole

जळगाव : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना स्वबळाची भाषा महागात पडली आहे. पक्षाच्या हाय कमांडने थेट दिल्लीत बोलावून पटोले यांना कानपिचक्या दिल्या आहेत. पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shivsena) हे घटक पक्षही हीच भाषा बोलू लागले होते.  

नाना पटोले यांनी आज काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी राज्याचे प्रभारी एच.के.पाटील उपस्थित होते. या तिघांची बैठक सुमारे पावणेदोन तास चालली. या बैठकीत स्वबळाच्या मुद्द्यावर नाना पटोले यांना कानपिचक्या देण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या बैठकीनंतर एच.के.पाटील म्हणाले की, स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा अपरिपक्व असून, आताच हा विषय नको. आता राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी याबाबत निर्णय घेता येईल. याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. राज्य सरकार चांगले काम करत आहे. ऑपरेशन लोटस राज्यात यशस्वी होणार नाही. सरकार धोक्यात नाही आणि आम्ही किमान समान कार्यक्रमानुसार काम करतोय. 

मागील काही दिवसांपासून नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडीतल नेतेही स्वबळाची भाषा करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले होते की, स्वबळ काय नवीन आहे का? गेल्या युती सरकार मध्ये शिवसेना, भाजपही भांडत होते ना. मग आता मी बोललो त्यांत काय? प्रतेक पक्षाचा तो अधिकार आहे.

स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे मी बोललो आणि माध्यमांनी तेच लावून धरले आहे. आता सत्तेत असलेल्या पक्षांनी स्वबळावर लढण्याचे घोषित करणे महाराष्ट्राला नवीन आहे का? या पूर्वी गेल्या पाच वर्षांत राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते,ते तर अगदी नळावरचे भांडण असल्याप्रमाणे भांडत होते, आणि प्रतेक पक्षाचा तो अधिकार आहे.त्या मुळे आपण बोललो. त्यात कोणतेही नावीन्य नाही अजून निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत, असे पटोले यांनी म्हटले होते. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव समान कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे खरेतर काँग्रेसला संजीवनी मिळाली. नाना पटोलेंच्या रूपात प्रदेश काँग्रेसला आक्रमक अध्यक्ष लाभला. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू झाले. विदर्भातून त्यांनी दौरा सुरू करताना स्वबळाचा नारा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com