या कारणामुळे राज्यात सध्या तरी राजकीय उलथापालथ होणार नाही : चंद्रकांत पाटील

त्यांची स्थिती फार वाईट होईल
In the state at present this Reason's No political developments : Chandrakant Patil
In the state at present this Reason's No political developments : Chandrakant Patil

नाशिक : महाराष्ट्रात सध्या तरी कोणतीही राजकीय घडामोड (political developments ) घडण्याची शक्यता कमी आहे. कारण, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. हे एकत्र राहिले नाही तर त्यांची स्थिती फार वाईट होईल आणि हे या तीनही पक्षांना माहिती आहे, त्यामुळेच ते तिघे एकत्र आले आहेत. याच कारणामुळे राज्यात सध्या तरी राजकीय घडामोड वैगेरे काही होईल, असे मला वाटत नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पवार-मोदी भेट आणि त्या अनुषंगाने राजकीय घडामोडी याबाबत स्पष्ट केले.

आगामी महापालिका निवडणुका आणि पक्षाच्या आढाव्यासाठी चंद्रकांत पाटील शनिवारी (ता. १७ जुलै) नाशिक दौऱ्यावर होते. पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील भाकीत केले. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत झालेली भेट आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात काही राजकीय घडामोडी घडणार का, या प्रश्नावर चंद्रकांतदादांनी तशी शक्यता फेटाळून लावत राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत भाष्य केले. 

ते म्हणाले की, अधिवेशनापूर्वी मोठे नेते एकत्र येऊन चर्चा करत असतात. त्याचप्रमाणे भारत-चीन सीमाप्रश्न, कृषी कायदे आणि नव्या सहकार मंत्रालयाबाबत पवार आणि मोदी यांच्यात चर्चा झाली असावी. केंद्र सरकारने नुकतेच निर्माण केलेले सहकार मंत्रालय व कायद्याची माहिती पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून घेतली असावी. गेल्या वर्षी करण्यात आलेले कृषी कायदे आणि त्याच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन, तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि त्यासंदर्भातील इम्पारिकल डाटा यांसदर्भातही चर्चा झाली असावी.

पाटील म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षाचे नेते विविध मंत्री तसेच पंतप्रधानांना भेटून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांच्या संदर्भात पाठपुरावा करत असतात. त्यामुळे पवार आणि मोदी यांच्यात आज दिल्लीत झालेली भेटी नार्मल भेट आहे, असे माझे मत आहे. पण तरीही काही घडले असेल, तर मला त्याबाबतची माहिती नाही.


शिवसेनेच्या आणखी दोन नेत्यांची चौकशी सुरू

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची वेगवेगळ्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सध्या  चौकशी सुरू आहे. याशिवाय, परिवहन मंत्री अनिल परब व सचिव मिलिंद नार्वेकर या शिवसेनेचे दोन नेत्यांचीही चौकशी सुरु आहे. या दोघांची बंगल्याची अनुषंगाने चौकशी सुरू आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकात बोलताना केला. 

सत्ता सोडणं अशक्य असतं

शिवसेनेबरोबर आमचे वैर नाही. महाविकास आघाडी सरकारविरोधात आमचे आंदोलन आहे. शिवसेनेसोबत आमचा पंगा नाही. आमच्या जागा जास्त असतानादेखील केवळ मुख्यमंत्री पद मिळालं नाही, म्हणून वेगळ्या विचारांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करणे आम्हाला मान्य नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणत तत्व, स्वाभिमान, निष्ठा गुंडाळून ठेवलं आहे. सत्ता असं फेविकोल आहे की ती सोडणं अशक्य असतं. आजतरी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणं शक्य वाटत नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com