जयंत पाटलांच्या घोषणेने दत्तात्रेय भरणेंना धक्का : न्यायालयात जाण्याचा इशारा

उजनीच्या पाण्यावरुन सुरू असलेल्या वादात सोलापूर जिंकले तर इंदापूरकर हारल्याचे सध्याचे चित्र आहे.
Jayant Patil's announcement shocks Dattatreya Bharane : Warning to go to court
Jayant Patil's announcement shocks Dattatreya Bharane : Warning to go to court

वालचंदनगर (जि. पुणे) : मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पुण्यातून उजनी धरणात वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजेनेद्वारे इंदापूर तालुक्याला देण्याच्या तत्वतः निर्णय रद्द करण्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. या घोषणे इंदापूरचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री भरणे यांना मोठा झटका बसला आहे. उजनीच्या पाण्यावरुन सुरू असलेल्या वादात सोलापूर जिंकले तर इंदापूरकर हारल्याचे सध्याचे चित्र आहे. (Jayant Patil's announcement shocks Dattatreya Bharane : Warning to go to court)

दरम्यान, निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात उजनी धरणाच्या पाण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचना पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी पुण्यातून वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी सुमारे ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्याला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या योजनेस २२ एप्रिल २०२१ रोजी तत्व:ता मान्यता देवून योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वपक्षीय आमदार व पुढाऱ्यांनी तीव्र विरोध करुन राज्यमंत्री दतात्रेय भरणे यांच्या विरोधामध्ये आंदोलन करुन निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. 

आज मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातील सोलापूर जिल्हाच्या वाट्याच्या पाण्याच्या एका थेंबालाही धक्का लागणार नसल्याचे सांगून २२ एप्रिलचा आदेश रद्द करण्याची सूचना दिली असल्याचे सांगितले. यामुळे इंदापूर तालुक्यासाठी उजनी जलशायातून होणारी उपसा सिंचन योजना बारगळली असून उजनीच्या पाण्यावरुन सोलापूर विरुद्ध इंदापूर सुरु झालेली लढाई सध्या तरी सोलापूरकर जिंकले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

उजनीच्या पाण्यासाठी न्यायालयात जाणार

यासंदर्भात निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे यांनी सांगितले की, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाल होता. तालुक्यातील २२ गावांतील तिसरी पिढी पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत. धरण उशाला कोरड घशाला अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची परस्थिती असून या उजनीच्या पाण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com