डोंबिवली : महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे आभार मानले आहेत. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपनी विरुद्ध अशीच कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ट्विट केले आहे. (MNS MLA Raju Patil thanked Aditya Thackeray)
डोंबिवलीच्या गांधीनगर नाल्यामध्ये केमिकलचे पाणी सोडले होते. त्यामुळे संपूर्ण नाल्यामध्ये हिरवे पाणी झाले होते. त्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट केले. यानंतर केडीएमसी आयुक्तांनी सुद्धा यांची दखल घेत एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास विनंती केली. त्यानंतर एमपीसीबीने प्रदूषणकाऱ्या रायबो फार्म या कंपनीवर कारवाई केली. त्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर अशीच कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कंपनीवर कारवाई केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की ''डोंबिवली गांधी नगर नाल्यात संभाव्य घातक सांडपाण्याची बातमी पाहताच एमपीसीबीने सदर कंपनीवर त्वरित कडक कार्यवाही केली. महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही. प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली जातील. कारवाई केल्यानंतरचा व्हिडीओ… आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केला होता.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या त्यानंतर संबंधित रायबो फार्म कंपनीवर कारवाई झाली.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.