Prerana Balkwade
Prerana Balkwade

खासदारताई, लसीसाठी दिल्लीला धरने धरा ना !

महाराष्ट्रात भाजपचे तेवीस खासदार आहेत. हे खासदार आपल्या गावात बसून राज्य शासनावर आरोप करीत आहेत. तुम्हाला खरोखर जनतेची काळजी असेल, तर बिनबुडाचे आरोप थांबवून लसीसाठी दिल्लीला जाऊन धरणे धरा अन् जनतेला लस मिळवून द्यावी.

नाशिक : महाराष्ट्रात भाजपचे तेवीस खासदार आहेत. हे खासदार आपल्या गावात बसून राज्य शासनावर आरोप करीत आहेत. तुम्हाला खरोखर जनतेची काळजी असेल, तर बिनबुडाचे आरोप थांबवून लसीसाठी दिल्लीला जाऊन धरणे धरा अन् जनतेला लस मिळवून द्या, असा व्हीडीओ राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

भाजपच्या खासदार डॅा. भारती पवार यांनी केंद्र शासनाने राज्याला लस दिली आहे. मात्र राज्य शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जनतेला लस मिळत नाही. लोक त्रस्त आहेत. तातडीने पुरेशा प्रमाणात लस द्यावी, अन्यथा मुंबईत आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्याला सौ. बलकवडे यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, खासदार पवार या डॅाक्टर देखील आहेत. त्यांनी पुरेशी माहिती घेऊन वक्तव्य करायला हवे होते. मात्र त्यांनी राजकीय भूमिकेने प्रेरीत होऊन विधाने केली आहेत. महाराष्ट्र हे एखादे शहर किंवा लहान राज्य नाही. एक-दिड लाख लसींचे डोस त्याला पुरतील तरी कसे?. राज्य शासनाची मागणी आठ लाख डोस आहे. केंद्र शासनाने दोन कोटी डोस देखील दिलेले नाही. केंद्र शासनाला कोरोना संद्रभात गांभिर्य नाही. महाराष्ट्राची स्थिती समजून घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत यावर देखली ते काहीच बोलत नाही.  

केंद्र शासन कोरोना लस देते, मात्र राज्य शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना लस मिळत नाही असा आरोप करण्याआधी खासदार पवार यांनी अन्य राज्यांची लोकसंख्या व त्या तुलनेत त्यांना मिळालेली लस किती हे सांगितले नाही. त्यांनी राज्याला सुमारे १.८० कोटी डोस केंद्र शासनाने दिले. त्यातील दिड ते पावणे दोन लाख डोस शिल्लक आहेत. मात्र त्याचे वितरण होत नाही असे सांगितले. वस्तुतः राज्य शासनाने लसीकरणाचे उत्तम काम केले आहे. मात्र केंद्राकडून पुरेसी लस मिळत नाही. त्यामुळे अडचणी येतात. 

सौ. बलकवडे यांनी खासदार भारती पवार यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्याएैवजी दिल्लीत कोरोना लस मिळावी यासाठी आंदोलन करावे. धरणे धरावेत, असा सल्ला दिला आहेत.

त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधीक तेवीस खासदार आहेत. या खासदारांनी राज्याच्या प्रश्नावर, जनतेच्या समस्यांवर काय काम केले? हे सांगावे. त्यांनी राज्य शासनावर राजकीय आरोप करण्याऐवजी या सर्व  खासदारांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्राला लस मिळत नाही तोपर्यंत धरणे धरावे. महाराष्ट्राला आठ कोटी डोस हवे आहेत. केंद्र शासनाने पावमे दोन कोटी डोस दिले आहेत. त्यातील बहुतांश लसीकरण झाले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाचे कौतुक केले आहे. त्यामुळे उर्वरीत डोस लवकर कसे मिळतील हे खासदारांनी पहावे म्हणजे जनतेची सोय होईल.
... 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com