फडणवीसांनी आता केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणावी : एकनाथ खडसे

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या गुजरात, पश्चिम बंगालला केंद्र सरकारने मदत केली आहे. मात्र, महाराष्ट्रालाकोणतीही मदत केलेली नाही.
Devendra Fadnavis should bring maximum help from Central Government : Eknath Khadse
Devendra Fadnavis should bring maximum help from Central Government : Eknath Khadse

जळगाव : राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. १ जून) वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आता त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. (Devendra Fadnavis should bring maximum help from Central Government : Eknath Khadse)

राज्याचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवारी) मुक्ताईनगर, रावेर भागात वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी कोथळी येथे एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. तसेच मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याबाबत माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ‘सरकारनामा’ शी बोलताना म्हणाले की, राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्य केले आहे. मात्र, आता या नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि निधी उपलब्ध करून द्यावा. तौक्ते वादळात नुकसान झालेल्या गुजरात, पश्चिम बंगालला केंद्र सरकारने मदत केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोकण तसेच इतर भागातील नुकसानग्रस्तांना केंद्र सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळवून द्यावी, असे आवाहनही खडसे यांनी केले आहे.

हेही वाचा : फडणवीसांच्या मुक्ताईनगर दौऱ्यात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 
 
देवेंद्र फडणवीस हे उचंदा परिसरात शेतीची पाहणी करत असताना तालुक्यातील मेळसांगवे गावातील शेतकऱ्याने ताफा अडवत माझ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी का येत नाही? असा जाब विचारत विष घेण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगरातून जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन अडवून पीक विमा योजनेतील बदललेल्या निकषांबाबत निवेदन दिले.  

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील वादळाने नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. त्यावेळी वरील प्रकार घडला. उचंदा शिवारात केळीबागांची पाहणी करत असताना मेळसांगवे येथील शेतकरी योगेश पाटील यांनी फडणवीसांचे वाहन अडविले. ‘माझ्या दोन हजार केळीच्या झाडांचे संपूर्ण नुकसान झाले असून माझ्या शेतापर्यंत चला’ अशी विनंती फडणवीसांना केली. मात्र, वाहने न थांबल्याने योगेश पाटील संतप्त झाले. राजकीय नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त करत हे दौरे केवळ फोटोसेशनसाठी करतात. यातून सरकारचा पैसा वाया जातो. मागील सरकारच्या काळातही अनेक दौरे झाले. मात्र, आमच्या पदरात काही पडले नाही, असे सांगत विष घेण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com