जळगाव : ''राज्यातील महाविकास आघाडी सरकारची स्थिती महात्मा गांधी यांच्या तीन माकडासारखी आहे, जनतेच्या प्रश्नावर बोलायचे नाही, एकावयाचे नाही आणि बघायचे नाही अशी त्याची भूमिका आहे, त्यामुळे राज्यातील जनता हवालदिल झाली आहे, '' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन Girish Mahajan यांनी केली आहे.
जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. आमदार गिरीश महाजन म्हणाले, ''राज्यातील स्थिती अत्यंत भयानक आहे. सत्ताधारी तिन्ही पक्षात एकवाक्यता नाही, काम करीत नाही, मात्र, केवळ श्रेय वादाची लढाई सुरू आहे. एक जण मदत घोषित करतो तर दुसरा नाही म्हणतो, एक परीक्षा रद्द करतो तर दुसरा परीक्षा घ्या म्हणतो काय चाललय हेच कळत नाही,''
अण्णा हजारेंसारखे व्हायचे असेल तर सोमय्यांनी भाजपमधील भ्रष्टाचार बाहेर काढावा
भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीत गेल्यानंतर राज्यात भाजप प्रदेशध्यक्ष बदलणार शा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात कोणतेही बदल होणार नाहीत या सर्व अफवा आहेत. चंद्रकांत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहतील.
मराठा, ओबीसी प्रश्नच नव्हता
राज्यातील कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष देत नाही त्यामुळे आज मराठा आणि ओ बी सी आरक्षणाचा प्रस्न निर्माण झाला आहे,आमचे सरकार असते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता असे मत ही त्यांनी व्यक्त केले. खानदेशात पाऊस नसल्यामुळे गंभीर स्थिती आहे, असे सांगून महाजन म्हणाले की खानदेशात कृत्रिम पाऊस पाडावा, यासाठी आपण मुख्यमंत्रीची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.