आमदार काळे यांनी आणले कालव्यांच्या कामांसाठी आणखी पंधरा कोटी

उजव्या कालव्याची वहनक्षमता ५४० वरून ७५० क्यूसेकपर्यंत, तर डाव्या कालव्याची वहनक्षमता ३०० वरून ४२५ क्यूसेकपर्यंत वाढवायची आहे. मात्र, त्यासाठी कालव्यांवरील जीर्ण झालेल्या मोऱ्या व पुलांची कामे करणे गरजेचे होते.
Ashutosh Kale.jpg
Ashutosh Kale.jpg

शिर्डी : गोदावरी (Godavari) उजव्या व डाव्या कालव्यांची वहनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन या कालव्यांवरील जीर्ण झालेल्या मोऱ्या व पुलांच्या बांधकामासाठी यापूर्वी चाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली. आता त्यात आणखी पंधरा कोटी रुपये खर्चाच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेची भर घातली. त्यामुळे या कामांवर आर्थिक तरतूद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. (MLA Kale brought another Rs 15 crore for canal works)

ते म्हणाले, ‘‘उजव्या कालव्याची वहनक्षमता ५४० वरून ७५० क्यूसेकपर्यंत, तर डाव्या कालव्याची वहनक्षमता ३०० वरून ४२५ क्यूसेकपर्यंत वाढवायची आहे. मात्र, त्यासाठी कालव्यांवरील जीर्ण झालेल्या मोऱ्या व पुलांची कामे करणे गरजेचे होते. आपण त्यासाठी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून यापूर्वी डाव्या कालव्यावरील दहा व उजव्या कालव्यावरील २२ मोऱ्यांच्या कामासाठी सुमारे चाळीस कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. काल त्यात आणखी पंधरा कोटी रुपये खर्चाच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेची भर पडली.’’

‘‘हिवाळी अधिवेशनात या कामांवर प्रत्यक्ष आर्थिक तरतूद व्हावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. आर्थिक तरतूद झाली, की ही कामे वेगाने व दर्जेदार होतील, याकडेही लक्ष देणार आहोत. खरे तर शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण यापूर्वीच व्हायला हवे होते. मुळा, पालखेड व नीरा या कालव्यांचे नूतनीकरण पूर्ण झाले. याकडे लक्ष वेधत आपण गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणाचा मुद्दा सरकार दरबारी सातत्याने मांडीत आहोत. त्याचे फलित म्हणून सुमारे ४५ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

कालव्याच्या नुतणीकरणास प्रारंभ

गोदावरी कालव्यांच्या रुंदीकरणास चालना मिळण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या कालव्यांची वहनक्षमता वाढल्यानंतर शेवटच्या टोकाकडील शेतीलाही पूर्ण दाबाने पाणी मिळेल. कमी वेळात आवर्तने पूर्ण होऊन पाणीनाश टळेल, हे लक्षात घेऊन आपण कालव्यांच्या नूतनीकरणाच्या कामास प्राधान्य दिले.
- आमदार आशुतोष काळे

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com