विरारमधील आगीनंतर नेते आले एकत्र आणि ठरवले की...

विरार पश्चिममधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला.
 Eknath Shinde, Dada Bhuse .jpg
Eknath Shinde, Dada Bhuse .jpg

विरार : विरार पश्चिममधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषीमंत्री दादा भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली, यात ऑक्सिजन, रेमिडेसिव्हि इंजेक्शन उपलब्द करुण देण्यावर भर देण्यात आला.

या आढावा बैठकीला दादा भुसे, एकनाथ शिंदे, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, जिल्ह्याधिकारी माणिक गुरसल, पालिका आयुक्त गंगाधरन डी हे उपस्थित होते. बैठकीत पालिका हद्दीतील रुग्णालयाचे फायर ऑडिट, शहरात अपुरा असलेला ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शन यावर चर्चा करण्यात आली. 

मोठया रुग्णालयाला ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मदत करणे आणि त्यांना यासाठी सबसिडी देणे. तसेच सद्या इंडस्ट्रीज बंद असून त्यांच्याकडचे रिकामे सिलेंडर मागून घेणे. बैठकीत अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 1 लाख रुपये देणार अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.   

दरम्यान, रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. ही घटना घडली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी झोपले होते आणि आयसीयूतील रुग्णांना बाहेर काढण्यासह कुणी नव्हते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


ऑक्सिजन पातळी घटतेय? मग घरच्या घरी हे करा...आरोग्य विभागाचा सल्ला

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील (आयसीयू) एसीचा स्फोट झाला. या अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला परंतु, आयसीयूतील 13 रुग्णांचा मात्र, मृत्यू झाला. या रुग्णालयात एकूण ९० जणांवर उपचार सुरू होते. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com