पूजाचे आई-वडिल म्हणतात, राठोडांचा राजीनामा घेऊ नका 

पूजा चव्हाण यांचे आई-वडील मला येऊन भेटले. त्यांनी मला पत्र दिले असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 Sanjay Rathore, Pooja Chavan, Chief Minister Uddhav Thackeray, .png
Sanjay Rathore, Pooja Chavan, Chief Minister Uddhav Thackeray, .png

मुंबई : पूजा चव्हाण यांचे आई-वडील मला येऊन भेटले. त्यांनी मला पत्र दिले असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला असल्याचे ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. 28 फेब्रुवारी) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले मला पूजाच्या आई-वडिलांनी सांगितले की, ''माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकारणी संजय राठोड यांच नाव जोडले जात आहे. मात्र त्यांचा राजीनामा घेऊ नका. आम्ही ती मागणी केलेली नाही. संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये, ते समाजाचे मोठे नेते आहेत. राजकारणामुळे पूजाचा रोज बळी जातोय याबाबत राजकारण केले जात आहे'', असे ते म्हणाले.   

''पूजा चव्हाण यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तक्रार केली आहे. त्याबद्दल त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याशी आपला कोणताही रक्ताचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच, पूजा चव्हाण हिच्या बदनामीबद्दलही संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील'', असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने रान उठवले. त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढ गेला. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असा विरोधकांनी इशारा दिला होता. त्यामुळे रविवारी दुपारी अखेर राठोडांचा राजीनाम घेण्यात आला. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राठोड यांनी राजीनामा दिला. तो काय फ्रेम करण्यासाठी दिलेला नसतो, तो आम्ही स्वीकारलाच आहे. तुम्हाला काय वाटतंय की राजीनामा दिला म्हणजे तो काय मी फ्रेम करून ठेवू का? विरोधी पक्षानी संजय राठोड यांच्यावर जी आगपाखड चालवली आहे. त्यामुळे वाटतंय की न्यायालय कशाला हवीत तुम्हीच निर्णय आणि काही ते ठरवा. तपास करा अथवा न करा पण ठोकाच हे विरोधी पक्षाचे वागणे चुकीचे आहे. 

चौकशी अहवालात संजय राठोड निर्दोष निष्पन्न झाले तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेणार का? या प्रश्‍नावर ठाकरे म्हणाले की, तपासाचा अहवाल येऊ द्या. पण, विरोधी पक्षाचा त्यावर विश्‍वास नसावा. यंत्रणांवर त्यांचा विश्‍वास नसेल, त्यामुळेच त्यांनी यंत्रणेला खोटे ठरवून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com