ठाकरे सरकार असंवेदनशील ; महिला आयोगाने फटकारलं

साकीनाका बलात्कार प्रकरणात ठाकरे – पवार सरकारची असंवेदनशीलता संतापजनक आहे.
Sarkarnama (99).jpg
Sarkarnama (99).jpg

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणी आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडीत कुंटुबीयांची भेट घेतली. आयोगाने National Commission for Women पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली आहे. महिला आयोगाच्या सदस्यांनी या घटनेवरुन महाविकास आघाडी सरकारवर Uddhav Thackeray ताशेरे ओढले आहे.

''ठाकरे – पवार सरकार इतके असंवेदनशील कसे राहू शकते की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. आयोग असता, तर महिलांना न्याय तरी मिळाला असता,'' असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी व्यक्त केले आहे.

''संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूकच करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. साकीनाका बलात्कार प्रकरणात ठाकरे – पवार सरकारची असंवेदनशीलता संतापजनक आहे. ऐन गणेशोत्सवात भर रस्त्यावर बलात्कार होतो. या सरकारच्या पोलिसांची मोकाट आरोपींना भीतीही वाटत नाही. महाराष्ट्रात गेली दोन वर्षे या सरकारने महिला आयोगच नेमलेला नाही,'' अशा शब्दांत आयोगाने महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे.  

लावणी सम्राज्ञी हातावर बांधणार घड्याळ ; अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
''गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. पण सरकार ढिम्म आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आठवडाभरात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामागे राज्यसरकारचा निष्काळजीपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत,'' असा आरोप महिला आयोगाच्या सदस्यांनी केला आहे.

साकीनाका परिसरातील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काल पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर विविध संघटनांनी तिच्या कुटुंबाची भेट घेतली. ‘आम्ही गरीब आहोत. आम्हाला न्याय द्या,’ अशी मागणी तिच्या आईने केली. गरिबीचा फायदा घेऊन जाणूनबुजून नराधमांनी माझ्या मुलीचा बळी घेतला, असे सांगताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

काल पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी भीम आर्मीचे मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ गेले असता त्यांना पोलिसांनी अडवले. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अखेर पोलिसांनी कुटुंबांना भेटण्याची त्यांना परवानगी दिली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केली. पीडित महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com