जयंत पाटील फडणवीसांना म्हणाले...हा हट्ट महाराष्ट्रात कुणी केला नव्हता!

भाजपनं शनिवारी राज्यभर चक्का जाम आंदोलन करत ओबीसी आरक्षणावरून सरकारला धारेवर धरलं.
Jayant Patil criticize Devendra fadanvis over OBC Reservation
Jayant Patil criticize Devendra fadanvis over OBC Reservation

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. भाजपनं शनिवारी राज्यभर चक्का जाम आंदोलन करत ओबीसी आरक्षणावरून सरकारला धारेवर धरलं. भाजपच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी बोलताना फडणवीस यांनी 'आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यांत आरक्षण देतो,' असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. (Jayant Patil criticize Devendra fadanvis over OBC Reservation)

फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले, मला सत्ता द्या, चार महिन्यांत आम्ही ओबीसींची प्रश्न सोडवतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. जर ओबीसींविषयी कळवळा असेल तर कसा सोडवणार हे मला सांगा मीच प्रश्न सोडवतो. तुम्ही सत्तेत येण्याची काही गरज नाही कारण महाराष्ट्रानं तुम्हाला नाकारलं आहे. पण सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्रासाठी काहीच करणार नाही. सत्ता आली की मी सगळं काही करेन. सत्ता मिळेपर्यंत मी महाराष्ट्रातील जनतेला काहीही मदत करणार नाही, ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटत नाही. 

भुजबळांनी आता त्यांना विनंती केली आहे की, तुमच्याकडं जर पर्याय असेल तर ओबीसींचं नेतृत्व करा. पण फडणवीस म्हणतात, मला सत्ता द्या मी प्रश्न सोडवतो. सत्ता तुम्हाला आली तर काम करणार, नाही तर करणार नाही, हा हट्ट महाराष्ट्रात कुठल्या नेत्यानं केला नव्हता, असा टोला पाटील यांनी लगावला. 

ओबीसी समाजाबद्दल भाजपला आता केवढा कळवळा आला आहे. छगन भुजबळ यांना दोन-अडीच वर्षे तुरूंगात खितपत पडून राहावं लागलं. त्यांना किती यातना दिल्या. एकनाथ खडसेंना पक्षातून बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण केली. भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही आणि ओबीसींच्या माध्यमांतून जी प्रगती ओबीसी नेते करत होते, ही चळवळच मारण्याचं काम भाजपच्या अंतर्गत होत होतं. आता त्यांनी रस्त्यावर येऊन भाजपने आंदोलन करणं हे प्रचंड हास्यास्पद आहे, असं पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस?

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळंच ओबीसींचं आरक्षण रद्द झालं. या अपयशाचं खापर सरकारकडून केंद्र सरकारवर फोडलं जात आहे. पण आम्ही आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हातात सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो. नाही दिलं तर राजकीय संन्यास घेईन, असं आव्हान फडणवीस यांनी सरकारला दिलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com