भाजपच्या 'त्या' नगसेवकांवर कारवाई होणार....

इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात उलथली आहे.
 Jayant Patil, Chandrakant Patil .jpg
Jayant Patil, Chandrakant Patil .jpg

सांगली  : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाने काढलेला  'व्हीप' डावलून भाजपच्या 5 सहयोगी नगरसेवकांनी 'काँग्रेस-राष्ट्रवादी'च्या उमेदवारांना मतदान केले होते तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले होते, त्या सगळ्या नगरसेवकांची चौकशी करणार, असल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले. 

महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात उलथली आहे. भाजपची सात सदस्य फुटले. पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोघे गैरहजर राहिले, त्यामुळे भाजपची सत्ता गेली. सत्ता गेल्याने ही गोष्ट भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.  त्यामुळे आता त्या नगरसेवकावर अपात्रता कारवाईचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.  

गेले चार दिवस रंगलेला सदस्यांच्या फुटीचा, उमेदवारीचा सस्पेन्स मंगळवारी (ता. २३ फेब्रुवारी) निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले. ३९ विरुध्द ३६ मतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले. भाजपकडे ४२ जणांचे बहुमत होते. मात्र त्यांची सकाळपर्यंतची जुळणी ३६ जणांपर्यंतच झाली होती. 

दोन सहयोगी सदस्यांपैकी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मगदुम होते. अन्य सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी कॉंग्रेस आघाडीला मतदान केले. त्यांच्याशिवाय नसीम नाईक, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, महेंद्र सावंत यांनी मतदान केले. त्यामुळे भाजपच्या चार मतांसह त्यांची हक्काची पाच मते  फुटली. कॉंग्रेस आघाडीच्या बेरजेतील राष्ट्रवादीच्या रईसा रंगरेज तटस्थ  राहिल्या. 

अडीच वर्षापूर्वी अत्यंत चुरशीच्या सामन्यात भाजपने काठावरचे बहुमत घेत घेतलेली सांगली महापालिकेची सत्ता ब्रॅन्डेड कमळ चिन्हावर ताब्यात घेतली होती. (हा ब्रॅन्डेड हा शब्द चंद्रकांतदादांचा आहे) अर्थात मोठ्या प्रमाणात दोन्ही कॉंग्रेसमधील रेडीमेड नगरसेवकच उमेदवार म्हणून फोडून घेतले त्यांना निवडून आणले होते, ही त्यांची कामगीरी होती. आता त्यांच्या आकांक्षा पूर्ण होत नसल्याने भाजपच्या जहाजाला अनेक भोके पडू लागली होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने या जहाजाला आज सत्तेतून समाधी दिली एवढेच! या निमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे आणि चंद्रकांतदादा यांच्याबरोबरचे अनेक हिशेबही पूर्ण केले. अर्थात कॉंग्रेस साथ दिल्यानेच हे घडले. 

गेले वर्षभर महापालिकेत आयुक्‍तांकडूनच सत्ताधाऱ्यांना डावलून निर्णय घेतले जात होते. महापौरांसह सर्व पदाधिकारी नामधारी झाले होते. भाजपची सत्तेवरची कमांडच संपली होती. भाजपचे नगरसेवक आपल्या कब्जात घेण्याची खेळी राष्ट्रवादीचीच पण त्यास कॉंग्रेसची नेमकी साथ मिळाल्याने भाजपचा `करेक्‍ट कार्यक्रम` झाला. (कार्यक्रम हा शब्द सतत जयंत पाटील वापरत असतात) या निवडणुकीची धुरा महापालिकेत छोटा भाऊ असलेल्या राष्ट्रवादीने हाती घेतली होती. त्याला जयश्री पाटील, विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील या कॉंग्रेस नेत्यांनी फक्त मम म्हटले. भाजपला 41 पैकी आपले 36 सदस्य टिकवतानाही धाक दाखवावा लागला. 

Edited By - Amol Jaybhaye   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com