..यासाठी नाना पटोलेंनी केले विश्वजीत कदमांचे अभिनंदन

सांगलीच्या महापौरपदी महाविकास आघाडीचे दिग्वीजय सुर्यवंशी निवडून आले. या विजयाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे
Nana Patole - Vishwajeet Kadam
Nana Patole - Vishwajeet Kadam

मुंबई : सांगलीच्या महापौरपदी महाविकास आघाडीचे दिग्वीजय सुर्यवंशी निवडून आले. या विजयाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी निवडणुकांतही भाजपला असाच धोबीपछाड देऊ, असा दावा पटोले यांनी केला आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात उलथली आहे. भाजपचेसात सदस्य फुटले. यापैकी पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोघे गैरहजर राहिले. सांगली महापालिकेच्या महापौरपदा विरोधी काँग्रेसने दावा केलेला असताना नगरसेवकांच्या बैठकीत राष्ट्रवादीनेही आक्रमक पवित्रा घेत महापौर पदासाठी आग्रही असल्याचा दावा केला होता. महापौरपदासाठीचा आघाडीचा उमेदवार कॉंग्रेसचा की राष्ट्रवादीचा याबाबतचा सस्पेन्सही आज कायम होता. पण अखेर राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याचे ठरले. 

त्यानंतर पटोले यांनी या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनपा पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले असून राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला असाच धोबीपछाड देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, सांगली महापालिकेत झालेले सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या  एकजुटीचा विजय आहे. भाजपाच्या एककल्ली कारभाराला जनता कंटळली असून विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त करून कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com