लखनौ : देशामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडली असल्याचे पाह्याला मिळत आहे. सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
मात्र, अशा परिस्थितीत यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मीक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. हरिद्वार येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणताही धर्म असो त्यातील आस्थेपेक्षा माणूस महत्वाचा, असल्याचे म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ हे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील साधू संत व धर्माचार्याची व्हीडीअो कॅान्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यात बोलतांना योगींनी कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी योगी म्हणाले, कोणताही धर्म असो त्यातील आस्थेपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. मानवासाठी आस्था आहे, आस्थेसाठी मानव नाही. कोरोनाच्या काळात याचे भान सर्वांनी राखले पाहिजे, हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यातील शाहीस्थानासाठी उद्या लाखो भक्त एकत्र येणार आहेत. तसेचे उद्यापासून रमजानचा महिना सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर योगींच्या या वक्तव्याला महत्व आहे.
मानवजात ही महत्वाची आहे, सध्याच्या वैश्विक महामारीत मानव जातीपुढेच आव्हान निर्माण झाले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्या आस्था काही काळ बाजूला ठेवल्या पाहिजेत. कारण मानवासाठी आस्था आहे, आस्थेसाठी मानव नाही, असे योगी यांनी स्पष्ट केले. मानवजात शिल्लक राहिली नाही तर त्या आस्थेला काहीच किंमत नाही. त्यामुळे आपल्या भावनांना मुरड घालून सध्या केवळ कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.