उरले फक्त बारा तास! 'यास' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार...लाखो लोकांना हलवले

मागील सहा तासांपासूनहे वादळ ताशी नऊ किलोमीटर वेगानेपुढे सरकत आहे.
Cyclone Yaas will intensify into Very Severe Cyclonic Storm during next 12 hours
Cyclone Yaas will intensify into Very Severe Cyclonic Storm during next 12 hours

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेले यास (Yaas) चक्रीवादळ वेगाने पश्चिम बंगाल व ओडिशाच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा  सामना करण्यासाठी केंद्र सरकारसह दोन्ही राज्यांकडून उपाययोजना केल्या जात आहे. पुढील बारा तासांत हे वादळ रौद्र रुप धारण करणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी दुपारी हे वादळ किनारपट्टीवर धडक देण्याची शक्यता आहे. (Cyclone Yaas will intensify into Very Severe Cyclonic Storm during next 12 hours)

मागील वर्षी याच कालावधीत अम्फानने पश्चिम बंगाल (West Bengal) व ओडिशामध्ये (Odisha) हाहाकार उडवला होता. जवळपास शंभर जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यास चक्रीवादळही दोन्ही राज्यांत थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांसह बिहार, छत्तीसगढ या राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यास च्रकीवादळ पुढील बारा तासात रौद्र रुप धारण करेल. मागील सहा तासांपासून हे वादळ ताशी नऊ किलोमीटर वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. याच वेगाने हे वादळ पुढे सरकत राहणार असून अधिक भयंकर होत जाईल. बुधवारी सकाळी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहचेल. तर दुपारी किनारपट्टी पार करेल. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी एवढा असेल. वादळाचा केंद्रबिंदू किनारपट्टीला धडकण्याच्या कालावधीत वाऱ्यांचा वेग ताशी १८५ किमी असण्याची शक्यता आहे.   

२० लाख नागरिकांना हलवलं

वादळाचा फटका लाखो लोकांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मागील आठवडाभरात वीस लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादळात एकही मृत्यू होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असल्याचे म्हटले आहे. 

समुद्रात चार मीटर उंचीचा लाटा

यास चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या दिवशी समुद्रात भरती आहे. चक्रीवादळ येण्याचा कालावधी आणि भरती कालावधी एकच असल्याने दोन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. किनारपट्टीलगत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहेत. किनारपट्टीलगतच्या भागात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर घुसण्याची शक्यता असल्याने लगतचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com