आई-बाबांचा चेहरा दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय.... 

दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते.
I have been waiting for two days to see the face of my parents
I have been waiting for two days to see the face of my parents

अलिबाग : दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर अंगावर काटे येणारी परिस्थिती आहे, कोणीही व्यवस्थित माहिती देत नाही. येथे पाणी नाही, राहण्याची व्यवस्था नाही. आई-बाबांचा चेहरा दिसेल, अशी आस लावून वाट पाहत बसलो आहे, ही भावना तळीये येथील ग्रामस्थ भावेश मालुसरे यांची. (I have been waiting for two days to see the face of my parents....)

एकूण 250 लोकवस्तीच्या महसुली तळीये या गावात 35 घरे आहेत. गावात कोंढाळकर धुमाळ, पोळ, शिरावळे, पांडे, मालुसरे अशी 35 कुटुंब राहतात, डोंगराच्या अगदी कडेला असलेल्या या गावातील बहुताश लोक नोकरी धंद्यानिमित्ताने मुंबई, पुणे, सुरत या शहरांमध्ये राहतात. गावात फक्त वयोवृद्ध, लहान मुले राहतात. गुरुवारी ही घटना घडताना गावात साधारण 80 लोक होती, यातील पाचजण वाचले आहेत. बाकीच्या नागरिकांवर निसर्गाने झडप घेतली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत 42 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे, तर अद्याप 41 लोक ढिगाऱ्याखाली गाढले गेले असावेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

हेही वाचा : तो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या गावाला भेट देत मृत्यूमुखी पडलेल्यांना धीर दिला. संपूर्ण डोंगर गावावर कोसळल्याने गावात आठ ते दहा फुट दगडगोठे- माती वाहून आलेली आहे. सर्व घरे बेचिराख झालेली असल्याने सद्या एकही घराची भिंत उभी दिसत नाही. यामुळे या ढिगाऱ्याखालून मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत आहेत, बचावकार्य राबवण्यासाठी अद्ययावत यंत्रसाहित्य घटनास्थळी नेता येत नसल्याने एनडीआरएफचे पथक, टीडीआरएफच्या पथकाने बचाव मोहिम शनिवारी सायंकाळी थांबवली आहे, अशी माहिती महाडचे प्रांताधिकाऱी विठ्ठल इनामदार यांनी माहिती दिली.  

दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच सतर्क होत त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असते, तर अनेक जण वाचले असते. मी, सासू, सासरे, मुलगी आणि नवरा थोडक्यात बचावलो, ही कृपाच आहे; परंतु आमचे आप्तस्वकीय यामध्ये आम्ही गमावले, हे आमच्यासाठी मोठे दु:खद आहे, असे सांगताना प्रत्यक्षदर्शी आणि तळीये गावातील रहिवाशी प्रतिभा नीलेश कोंढाळकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

गावाच्या शेजारच्या वाडीतील जीत झिंजे यांनी सांगितले की, तळीये वाडीतील दरड कोसळत असताना मोठा आवाज झाला. सायंकाळची घटना होती. पाऊस कोसळत होता. पुन्हा दरड कोसळण्याच्या भीतीने कुणीही पुढे येत नव्हते. या दरडीची दहशत आमच्यामध्ये बसली होती, असेही झिंजे यांनी सांगितले.

आमचे पूर्ण कुटुंब या संकटात सापडले. आई-वडील, भाऊ आणि दोन लहान बहिणी असे पाच जण बेपत्ता आहेत. दरड कोसळल्याची घटना समजल्यानंतर रात्री पुणे येथून तातडीने गावात आलो. येथे आल्यानंतर मनाचा थरकाप उडवणारे दृश्‍य पाहून सुन्न झालोय. काय बोलावे हे सुचत नाही, असे सांगताना सुनील कोंढाळकर या तरुणाने अक्षरश: हंबरडा फोडला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com