चंद्रकांतदादा म्हणाले, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत युतीचा विचारही नाही, पण...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव कमी केल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजू शेट्टी हा आमचा जुना मित्र आहे.
Chandrakant Patil - Uddhav Thackeray
Chandrakant Patil - Uddhav Thackeray

अकोला ; २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेने आमच्यासोबत मोठा दगा केला. पाठीत खंजिरच खुपसला. त्यामुळे सध्या तरी स्वबळावरच आगामी निवडणुका भाजप लढविणार. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत युतीचा विचारही मनात नाही. There is no idea of an alliance with those who stabbing back पण माणूस आशेवर जगत असल्याने भविष्यात काहीही होऊ शकते. कार्यकर्त्यांना मला संभ्रमात ठेवायचे नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील State President of BJP Chandrakant Patil यांनी आज व्यक्त केले. 

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी बुलडाणा दौऱ्यावर जाण्यापूर्वी अकोला येथे भाजप पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, आमदार व कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांसोबत बोलताना त्यांनी शिवसेनेसोबतच्‍या युतीबाबतचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. शिवसेनेने सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युतीचा कोणताही विचार नाही. सध्या तरी आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहोत. कार्यकर्त्यांना मला संभ्रमात ठेवायचे नाही. ही जागा लढायची की नाही, ही द्विधा मनःस्थिती संपवून त्यातून कार्यकर्त्यांना बाहेर काढायचे आहे, असे पाटील म्हणाले. 

पाच जिल्हे सोडून निवडणुका 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण झाल्याने पाच जिल्ह्यांतील निवडणूक घेता येणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार इतर जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवून निवडणूक घेता येणार आहे. ओबीसीतील जातींच्या समावेशाबाबत कोणतीही अडचण नाही. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असल्यास निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले. 

ही बातमी पण वाचा ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक सुरू, ३६ संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग..
 
झोप उडाली नसेल तर कशाला लक्ष देता ! 
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, तुमची झोप उडाली नसेल तर कशाला लक्ष देता. माझ्या म्हणण्याने अस्वस्थ होत नसाल तर लक्ष देवूच नका ना, असे ते म्हणाले. 
 
मराठ्यांना मागास सिद्ध करूनच आरक्षण 
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्य़ावर बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मराठा समाजाला मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संपूर्ण यंत्रणा कामी लावून त्यांनी सात महिन्यात हे काम केले होते. आत्ताच्या सरकारला त्यासाठी चार वर्षे लागतील, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 
 

राजू शेट्टींना सोबत घेण्याचे संकेत 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव कमी केल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजू शेट्टी हा आमचा जुना मित्र आहे. मी त्याला नेहमी ‘लक्ष्मीचा नवरा’ म्हणत होतो. मात्र, उठसूठ मोदींवर ते टिका करीत होते. मोदी हे आमच्यासाठी पितृतुल्य आहे. त्यामुळे शेट्टी दुरावले होते. पुन्हा जवळ येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही पाटील म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com