शवविच्छेदन झाले, दीपालीच्या पार्थिवावर रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार...

दीपाली यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
Deepali Chavan
Deepali Chavan

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काल हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेला जबाबदार असलेले उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक केल्यानंतरही मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका दीपालीच्या कुटुंबीयांनी घेतली होती. प्रशासनाने कुटुंबीयांची समजूत काढल्यानंतर आज सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अंत्यसंस्कार रात्री उशिरा मोरगाव येथे करण्यात येणार आहेत. 

दीपाली चव्हाण यांचे वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्यामुळेच आत्महत्या करत असल्याचे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्रात लिहिले आहे. या घटनेला मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीसुदधा तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप करीत जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक होणार नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, प्रशासनाने नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर दीपाली यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज सायंकाळी करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील लोणी-टाकळी येथील मोरगाव येथे रवाना करण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान दीपाली यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

दीपाली चव्हाण यांना उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते येऊन गेले, त्यावेळी दीपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे. दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. दीपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. 

‘माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी शेवटची इच्छा आहे,’ असे दीपाली चव्हाण यांनी सूसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. ‘माझे रोखलेले वेतन माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला द्या, विनोद शिवकुमार यांच्याबाबत आपल्याकडे खूप तक्रारी आहेत. त्या गांर्भीयाने घ्या’, असे चव्हाण यांनी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'शिवकुमार यांच्याकडे काही जणांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या. त्याची शहानिशा न करता शिवकुमार मला निलंबित करण्याची धमकी देत होते. माझ्याकडे तीन गावांच्या पुनर्वसनाचे काम होते. या कामाविषयी माझी बाजू ते ऐकून न घेता ते मला शिवीगाळ करीत होते. मागील आठवड्यापासून ते वारंवार हरिसाल येथे येत आहेत. मला खूप वाईट बोलतात. यांचा मला खूप मानसिक त्रास होत आहे’, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com