पाणीपुरवठा योजनेचे काम वेळत पुर्ण करा; समांतर सारखा हलगर्जीपणा चालणार नाही..

कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास तो तात्काळ सोडविण्यासाठी मी रात्रंदिवस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
Mim Mp Imtiaz Jalil Review Meeting News Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil Review Meeting News Aurangabad

औरंगाबाद : शहरासाठी मंजुर झालेल्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पारदर्शकपणे व वेळेआधी पुर्ण करा, अशा सूचना खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या. (Mp Imtiaz Jalil Reviwe Meeting With Maharashtra Jeevan Pradikarn Officers For Water project) या योजनेची गत संमातर सारखी झाली तर कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पाणीपुरवठा योजने संदर्भात महाराषष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता अजय सिंह व इतर अधिकाऱ्यांसोबत इम्तियाज जलील यांनी आज सुभेदारी विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. (Water Scheme for Aurangabad City)औरंगाबाद शहराला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत १६८० कोटीच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 

या बैठकीत इम्तियाज जलील म्हणाले,  योजनेचा उद्भव हा जायकवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित विभागाकडून काम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल. ( I Will Saport For Water Scheme Speedy Work) सदरील महत्वपुर्ण योजनेचे काम पुर्ण करत असतांना कोणत्याही स्तरावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास तो तात्काळ सोडविण्यासाठी मी रात्रंदिवस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

यापुर्वीच्या समांतर जलवाहिनीतील भ्रष्टाचार पाहता सदरील योजना महानगरपालिका ऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळातर्फे राबविण्यात यावी, यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न केले. औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील यावर भर दिला . त्यानंतर शासनस्तरावर तशी मंजुरी मिळाल्याची आठवण देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी करून दिली. 

योजना रखडू देणार नाही..

ही योजना औरंगाबाद शहरात पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिने अतिशय महत्वाची असल्याने योजनेचे काम पुर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या व गुणवत्तापुर्वक काम करावे. जेणेकरुन नागरीकांना मुबलक व सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकेल. शकतो. (Municipal Corporation Financial Condision Poor) या योजनेचे काम पुर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला आपला वाटा सुमारे ३०० कोटी द्यावे लागणार आहेत. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे सदरील योजना रखडू शकते, अशी शंका देखील इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या वाट्याला येणारी रक्कम अमृत योजनेतंर्गत प्रस्तावित करण्यात यावी. अमृत योजनेत समाविष्ठ करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव खात्यामार्फत तयार करून द्यावा, तो  केंद्र शासनाकडून  मंजुर करून आणतो, अशी ग्वाही देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी यापुर्वी शासनाने समांतर जलवाहिनीला परवानगी देवून निधी दिला होता.

समांतर योजना पुर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेला देण्यात आली  होती परंतु ती योजना पुर्ण होण्याअगोदरच अनेक त्रुटी व भ्रष्टाचारामुळे न्यायप्रविष्ट होवून बासनात गेली. त्यासोबतच औरंगाबादकरांच्या स्वप्नावर पाणी फिरले गेले.  त्यामुळे दरील योजना राबविण्यात हलगर्जीपणा, दिरंगाई केल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची गय करणार नाही, अशा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com