कर्नाटकात वारे फिरले...मुख्यमंत्री येडियुरप्पांना पाठिंब्यासाठी काँग्रेस आमदार मैदानात

मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना हटवले जावे, अशी भाजपमधूनच मागणी होत आहे.
congress mla m b patil backs karnataka chief minister b s yediyurappa
congress mla m b patil backs karnataka chief minister b s yediyurappa

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे, अशी पक्षातूनच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार हे येडियुरप्पांना पाठिंब्यासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांना हटवल्यास राज्यातील लिंगायत समाजात असंतोष निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  

काँग्रेसचे आमदार एम.बी.पाटील हे स्वत: लिंगायत समाजाचे आहेत. ते म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने येडियुरप्पांना मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यास राज्यातील लिंगायत समाजात रोष निर्माण होईल. येडियुरप्पा हे लिंगायत नेते आहेत. त्यांना पदावरुन हटवण्यास लिंगायत समाजाचा विरोध आहे. येडियुरप्पा यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि त्यांचे वय पाहून भाजप नेतृत्वाने त्यांचा सन्मान करायला हवा. 

पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. पाटील यांचा मतदारसंघ बाभळेश्वर असून, जलसिंचन प्रकल्पांच्या कामासाठी सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा, या मागणीसाठी पाटील हे येडियुरप्पांना भेटले होते. 

येडियुरप्पा यांना नुकतेच पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर येडियुरप्पांना प्रसारमाध्यांनी राजीनाम्याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कुठला राजीनामा, असा प्रतिप्रश्न माध्यमांना केला होता. ते म्हणाले होते की, मी पंतप्रधानांना भेटलो आहे. राज्यातील विकासकामांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी पुन्हा ऑगस्टमध्ये दिल्लीत परत येणार आहे. राजीनाम्याचा बातम्यांना अजिबात महत्व नाही. राज्यातील नेतृत्व बदलाबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. मला कुणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.

उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच अचानक दिल्लीत बोलावण्यात आले होते. नंतर त्यांनी राज्यात परत जाऊन थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. परंतु, पक्ष नेतृत्वाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com