राज्यात यायचं असेल तर आधी लस घ्या! बंधन घालणारं देशातील हे पहिलंच राज्य

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
Arunachal Pradesh allow entry only for vaccinated people
Arunachal Pradesh allow entry only for vaccinated people

इटानगर : देशात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर अनेक राज्यांनी प्रवेशासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी बंधनकारक केली होती. काही राज्यांमध्ये अजूनही ही अट आहे. पण आता राज्यांकडून लसीकरणाचे बंधन घालण्यास सुरूवात करण्यात आली आहे. असं बंधन घालणारं अरूणाचल प्रदेश पहिलं राज्य ठरलं आहे. यापुढे या राज्यात लस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. (Arunachal Pradesh allow entry only for vaccinated people)

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अरूणाचल प्रदेशने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिका नागरिकांचे लसीकरण करण्याबरोबरच राज्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांपासून संसर्ग रोखण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळं अन्य राज्यांतून येणाऱ्यांना लस घेतलेली असणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी दिली आहे.

गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत ईशान्येकडील राज्यांतील मुख्य सचिवांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत नरेश कुमार यांनी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना ही माहिती दिली. संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ट्रॅकिंग, टेस्टिंग, निर्णयांची कठोर अंमलबजावणी आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. अरूणाचल प्रदेशातील 68 टक्क्यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. 

यावेळी कुमार यांनी राज्यात येणाऱ्या नागरिकांना प्रवेश करण्यापूर्वी लस घेतलेली असणे बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच राज्याला अतिरिक्त तीन लाख लशींची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, मंगळवारी देशातील 17 राज्यांतील 73 जिल्ह्यांचा 29 जून ते 5 जुलै या कालावधीतील पॅाझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळं या जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

या 17 राज्यांपैकी 8 राज्य ईशान्येकडील आहेत. देशातील 73 जिल्ह्यांपैकी 18 जिल्हे अरूणाचल प्रदेशातील आहेत. मणीपुरमधील 9, मेघालयातील 6, त्रिपुरातील 4, सिक्कीममधील 4, ओडिशातील 3, नागालँडमधील 3 आणि आसाम व मिझोराममधील अनुक्रमे दोन व एका जिल्ह्याचा समावेश आहे. अरूणाचल हे लशीचे बंधन घालणारे पहिले राज्य ठरले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com