अनुराधा धावडे
राज्यातील सत्तांतराच्या काळापासून आजतागायत उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे सुनील प्रभू यांनी मांडली. शिवसेनेचे प्रतोद आणि निष्ठावान अशी त्यांची ओळख आहे.
खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राऊत सत्तासंघर्षाच्या या लढाईत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सुरत गाठलं तेव्हा पासून आदित्य ठाकरे वडील उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत.
भास्कर जाधव - गुहागर
शिवसेनेची तोफ अशी ओळख असलेले आणि बंडखोर आमदारांना थेट अंगावर घेणारे भास्कर जाधव ठाकरे गटाची खिंड लढवत आहेत
रविंद्र वायकर - जोगेश्वरी
आमदार रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. २०२१ मध्ये ईडीने आठ तास चौकशी केली होती. पण तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.
शिवसेनेचे जायंट किलर म्हणून वैभव नाईकांची ओळख आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर वैभव नाईकांनी कोकणात शिवसेनेचा गड राखला.
बंडखोरीच्या रात्री एकनाथ शिंदेसोबत सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये नितीन देशमुखही होते. पण ते दोन दिवसातच त्यांच्या गटातून निसटुन ठाकरेंकडे परत आले.
बंडखोरीच्या रात्री शिंदेंसोबत जाणाऱ्यामध्ये कैलास पाटीलही होते. पण सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिथून कशीबशी सुटका करुन घेतली. मिळेल त्या मार्गाने त्यांनी मुंबई गाठली आणि आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
रमेश कोरगावकर - भांडूप
सत्तांतराच्या काळात भांडुप वेस्टचे आमदार रमेश कोरगावकर हेदेखील उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहिले.
राजन साळवी - राजापूर
राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात. कोकणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदरांपैकी ठाकरेंसोबत जे आमदार आहेत त्यात राजन साळवी यांचं नाव येतं.
कलिना मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस आजही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत.
चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेला विजय मिळवून दिला. तेव्हापासून ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन हटवून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली.
कन्नडचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत चार वेळा वेगवेगळ्या पक्षातून लढल्यानंर त्यांना २०१९ मध्ये शिवसेनेने संधी दिली आणि ते पहिल्यांदा निवडून आले. बंडखोरीच्या चर्चा सुरु असताना १५ वेळा उद्धव ठाकरेंना भेटल्याचं त्यांनी सांगितलं
ऋतुजा लटके- अंधेरी
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आक्समिक निधनानंतर त्यांच्या जागी त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवली. लटके यांनी पहिल्यांदा मशाल चिन्हावर निवडणूक लढवली.