Rashmi Mane
पंजाबच्या झेलम जिल्ह्यात जन्मलेल्या सुनील यांचे बालपण भारत आणि पाकिस्तानची फाळणी आणि त्यादरम्यान उसळलेल्या दंगली पाहण्यात गेले.
फाळणीत त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानच्या भागात गेले आणि सुनील त्यांच्या आई आणि बहिणीसोबत भारतात राहिले.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रेडिओवर काम केले, तेथूनच त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारे उघडली.
दत्त यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्रीसह सुमारे 12 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर दत्त यांनी राजकारणातही मोठे योगदान दिले.
सुनिल दत्त यांचे जवळचे मित्र राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून दत्त यांनी राजकारणात प्रवेश केला.
1984 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला . वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड.
सुनील 5 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. 2004-2005 दरम्यान मनमोहनसिंग यांची सत्ता असताना ते क्रिडा विभागाचे कॅबिनेट मंत्रीसुध्दा होते.
सुनील दत्त यांनी राजकारणाच्या जोरावर मुंबईतील अनेक गरिब आणि वंचित लोकांची सेवा करण्याचं काम केलं.