सरकारनामा ब्यूरो
विधीमंडळाच्या पायऱ्यांना नमस्कार करून पुन्हा विधीमंडळात 'पाय ठेवण्याची इच्छा नसल्याची' भावुक प्रतिक्रिया देत भास्कर जाधव माघारी परतले.
या घटनेमुळे सध्या भास्कर जाधव सध्या चर्चेत आहेत.
राज्यातील अभ्यासू आणि तितकेच आक्रमक नेते म्हणून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची ओळख आहे.
भास्कर जाधव यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने 1982 पासून सुरुवात झाली. शिवसैनिक म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
भास्कर जाधवांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला, राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक जिंकले.
2019च्या निवडणुकीपूर्वी जाधव यांनी अचानक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. तब्बल 15 वर्षानंतर ते शिवसेनेत परतले. त्यानंतर त्यांनी 2019मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर गुहागरमधून निवडूनही आले.
विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात बोलू दिले जात नाही, असा आरोप करत ते विधानसभेतून बाहेर पडले.