Rashmi Mane
भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांची आज पुण्यतिथी.
1930 मध्ये मोरारजी देसाई यांनी ब्रिटिश सरकारची नोकरी सोडून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता.
1931 मध्ये त्यांची गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून निवड झाली होती.
अखिल भारतीय युवक काँग्रेसची शाखेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
मोरारजी यांनी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
1975 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला.
अर्थमंत्री असतांना देसाई यांनी दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. स्वतःच्या वाढदिवसा दिवशी दोनदा अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे एकमेव अर्थमंत्री आहेत.
मोरारजी देसाई हे भारताचे चौथे पंतप्रधान होते त्यांनी देशाच्या पहिल्या बिगर काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले. 24 मार्च 1977ला वयाच्या 81व्या वर्षी मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
मोरारजी देसाई यांना भारत सरकारकडून 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काने सन्मामित करण्यात आले आहे. त्यांना पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट नागरी 'तेहरिक-ए-पाकिस्तान' हा पुरस्कर मिळाला आहे.
मोरारजी देसाई हे गांधीवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते.