Rashmi Mane
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील अमदरा गावातील सुरभी गौतम यांनी २०१६ साली 'यूपीएससी' परीक्षेत 50 वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाल्या.
सुरभी यांंचे शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेत हिंदी माध्यमात झाले. त्यामुळे इंग्रजी भाषा बोलण्याविषयी प्रचंड न्यूनगंड होता. पण सुरभी यांनी त्यांच्या न्यूनगंडातून बाहेर पडत, पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याचा निर्धार केला. त्यांनी इंग्रजी भाषेवर काम करायला सुरूवात केली.
जिथे मूलभूत सुविधाही क्वचितच उपलब्ध होत्या. शाळेत वीज आणि पुरेशी पुस्तकेही उपलब्ध नव्हती. अभ्यासासाठी त्यांनी सर्वाधिक मेहनत करत दहावीला ९३.४ टक्के मिळवले.
बारावी झाल्यानंतर, भोपाळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स या विषयात सुरभी यांनी इंजिनिअरींग पूर्ण केले.
सुरभी गौतम यांनी BARC, ISRO, GTE, SAIL, MPPSC, SSC, FCI आणि दिल्ली पोलिस यांसारख्या अनेक स्पर्धात्मक परीक्षेत यश मिलवले आहे.
2013 मध्ये सुरभीने IES परीक्षाही उत्तीर्ण केली होती. यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. पण त्यांचे ध्येय 'आयएएस' होण्याचे होते.
तिने तयारी सुरू ठेवली आणि देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करत 'आयएएस' झाल्या.