Rashmi Mane
1984 च्या लोकसभा निवडणुकीत लोकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण, गांधी घराणे एकमेकांविरोधात निवडणूक लढत होते. राजीव गांधी यांच्या विरुध्द संजय गांधी यांची पत्नी मनेका गांधी यांच्यात ही लढत झाली.
1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निवडणुका झाल्या तेव्हा मेनका गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
विमान अपघातात संजय गांधी यांच्या निधनानंतर 1980 मध्ये पोटनिवडणूक झाली होती. मनेका राजकारणात उतरतील आणि पतीच्या जागेवरून निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अमेठी जागेवर पोटनिवडणूक झाली. १९८१ मध्ये पोटनिवडणुकीत राजीव गांधी पहिल्यांदा या जागेवरून खासदार झाले.
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींचा सामना मनेका गांधी यांच्याशी झाला.
इंदिरा गांधींची हत्या सहानुभूतीच्या लाटेत अमेठीच्या लोकांनी मनेकांना नाही तर राजीव गांधींना मतदान केले आणि राजीव गांधी निवडून आले.
मनेका गांधींच्या सभांना मोठा जनसमुदाय जमायचा, पण या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होऊ शकले नाही.