सरकारनामा ब्यूरो
भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर रमेश बैंस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
बैंस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत.
त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपालपद भुषवले आहे.
बैंस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात महापालिकेपासून झाली. १९७८ मध्ये ते पहिल्यांदाच रायपूरनगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
१९८० ते १९८४ दरम्यान मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
१९८९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले.
त्रिपुरा आणि झारखंडचे ते राज्यपाल राहिले आहेत.
१९९८ ते २००४ या दरम्यान केंद्रीयमंत्री असताना त्यांनी विविध मंत्रीपदे भूषवली आहेत.