सरकारनामा ब्यूरो
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले सुराज्य पुनर्स्थापित करण्यासाठी 'स्वराज्य संघटने'ची स्थापना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती.
स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यभर स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत ‘गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य’ अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत संभाजीराजे छत्रपती धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
संभाजीराजे यांनी नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन केले.
या गावातील सहकाऱ्यांसोबतचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
धाराशिव येथील भूम तालूक्यातील शेखापूर, मानकेश्वर, देवळाली, आरसोली, गोलेगाव, चिंचपूर, वांगी,आष्टा, नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन या दौऱ्या दरम्यान झाले.
सहकाऱ्यांसोबत द्राक्षांच्या बागेत जेवण करतांनाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
"फार सुंदर अनुभव होता. असच प्रेम मिळत राहो हिच जगदंबे चरणी प्रार्थना!" असं देखील त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.