सरकारनामा ब्यूरो
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी गळ्यात कापूस, कांद्याची माळ घालून विधीमंडळाच्या पायऱ्यावर अनोखं आंदोलन केलं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होत डोक्यावर कांद्याची टोपली घेत, त्यांनी विधानभवनात प्रवेश केला.
मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे.
त्यासाठी ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे.
मात्र, निदर्शने करूनसुद्धा कांद्याला भाव मिळत नाही.
कांद्याला रास्त भाव मिळण्याची मागणी करत विधानभवनात अनोखं आंदोलन करण्यात आलं.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात बॅनर घेत घोषणाबाजी केली.