नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने शेती व शेतकरी दोन्हींवर आसमानी संकट कोसळले आहे. यासंदर्भात विविध पक्षाच्या नेत्यांच्या दौऱ्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या (ता. 4) नाशिकचा दौरा करणार आहेत.
निवडणुक निकालानंतर अनेक भागात आमदारांनी सत्काराला फाटा देत थेट बांधावर जाऊन पाहणी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्याची राज्यभर चर्चा झाली. रासपचे महादेव जानकर यांनी दौरा केला. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ पालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, बाजरी या सगळ्याच पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांचा दौरा होत आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
उद्या (ता.4) आदित्य ठाकरे यांचे ओझर येथे विमानाने आगमन होईल. त्यानंतर ते दिंडोरी, चांदवड, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड या मतदारसंघातील काही गावांना भेट देऊन पाहणी करतील. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते विभागीय महसुल आयुक्तांच्या कार्यालयात भेट देऊन दुष्काळ, नुकसान तसेच अन्य प्रशासकीय कार्यवाही विषयी चर्चा करणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.