इच्छाशक्तीअभावी तीन मुख्यमंत्री होवूनही मराठवाड्याचा विकास झाला नाही - येडियुरप्पा

 इच्छाशक्तीअभावी तीन मुख्यमंत्री होवूनही मराठवाड्याचा विकास झाला नाही - येडियुरप्पा

लातूर : महाराष्ट्राला मराठवाड्याने तीन मुख्यमंत्री दिले, पण इच्छाशक्तीअभावी मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कॉंग्रेसवर केली. या भागातील जनता अजूनही पाण्यासाठी तरसते हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ बुधवारी झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर, खासदार भगवंत खुब्बा, उमेदवार लाहोटी आदींची उपस्थिती होती. 

येडियुरप्पा म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विकासाची दृष्टी आणि इच्छाशक्ती आहे. त्यामुळे लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी उजनी धरणातून पाणी आणण्याची योजना तयार केली आहे. राज्यातील फडणवीस सरकारची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे दोन तृतीयांश बहुमताने भाजप व शिवसेना महायुतीचे सरकार राज्यात येणार आहे. अशावेळी या भागाचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना मताधिक्‍याने विजयी करावे, असे आवाहनही येडियुरप्पा यांनी उपस्थितांना केले. 

कॉंग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांचे वडिल राज्यात मुख्यमंत्री होते. त्यांनी या भागाचा का विकास केला नाही, हे जनतेने अमित देशमुख यांना विचारले पाहिजे असे आवाहन देखील येडियुरप्पा यांनी भाषणात केले. इच्छाशक्ती नसल्याने या भागाचा विकास होवू शकला नाही असा टोला लगावतांनाच लाहोटी परिवाराचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान राहिल्यामुळे राज्यात भाजप सरकार आणण्यासाठी आणि या भागाचा विकास करण्यासाठी लाहोटी यांना निवडूण द्या असे आवानह येडियुरप्पांनी केले. 

महाराष्ट्रत आलेल्या पुरामुळे कर्नाटकातील अनेक गावांना फटका बसला आहे. पुरामुळे जनताही त्रस्त झाली. यातून पाणीवाटपाचा प्रश्न निर्माण झाला. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हा पाणीवाटप प्रश्न आम्ही सामंज्यस्याने सोडवू. यातून दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांचा फायदाच होईल असे सांगत त्यांनी कर्नाटक-महाराष्ट्र पाणी वाटप विषयाला देखील हात घातला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. याचा महाराष्ट्रातील गावाना जसा फटका बसला तसा तो कर्नाटकातील गावांनाही बसला. आमची जनताही त्रस्त झाली. त्यानंतर मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेवून एकमेकांना सहकार्य केले. खरे तर महाराष्ट्र आणि कर्नाटक हे एकाच आईचे लेकरं आहेत. त्यामुळे हा पाणीवाटप प्रश्न आम्ही सामंज्यस्याने सोडवू याचा पुनरुच्चार येडियुरप्पा यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com