संजयकाकांना मंत्रिपदाची प्रदेश भाजपची शिफारस?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित मंत्रिमंडळात खासदार संजय पाटील यांचा समावेश करावा, अशी शिफारस प्रदेश भाजपने केल्याची माहिती आहे. राज्यातील विभाग, प्रभाग, जात आणि आगामी विधानसभेला लाभ या निकषांवर भाजपने काही नावे राष्ट्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यात संजयकाकांना संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
संजयकाकांना मंत्रिपदाची प्रदेश भाजपची शिफारस?

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित मंत्रिमंडळात खासदार संजय पाटील यांचा समावेश करावा, अशी शिफारस प्रदेश भाजपने केल्याची माहिती आहे. राज्यातील विभाग, प्रभाग, जात आणि आगामी विधानसभेला लाभ या निकषांवर भाजपने काही नावे राष्ट्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यात संजयकाकांना संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

खासदार संजय पाटील सलग दुसऱ्यांदा लोकसभेला निवडून गेले आहेत. देशात कॉंग्रेस पडेल, मात्र सांगलीत ते होणे नाही, अशा स्थितीत संजयकाकांनी 2014 ला कॉंग्रेसचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त केला होता. त्यानंतर येथे भाजपची त्सुनामी कायम आहे. चार आमदार, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्यांवर सत्तेच्या माध्यमातून पक्ष तळागाळात रुजला आहे. संजयकाकांना सध्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असून ते महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपकडून निवडून आलेल्या मराठा खासदारांत संजयकाका "सिनिअर' आहेत.

या साऱ्या निकषांवर विचार करता प्रदेश भाजपने संजय पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या नेत्यांत त्यांचा समावेश आल्याने त्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. येथे प्रचार सभांमध्येही भाजपचे नेते संजयकाका खासदार झाल्यावर आपणास शपथविधीला दिल्लीला जायचे आहे, असे सांगत होते. आता कार्यकर्त्यांच्या मनात भावना तीव्र आहेत, त्याच भाजप श्रेष्ठींच्या मनात आहेत का, हे पाहण्यासाठी एक दिवस थांबावे लागेल.

मंत्रिपदाचे वेध, कार्यकर्ते दिल्लीला रवाना
भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा एकतर्फी यश मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. काही उत्साही कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठली आहे. अनेकजण निघण्याच्या तयारीत आहेत. तालुक्‍याचे लक्ष 30 मे च्या शपथविधीकडे लागले आहे.

खासदार संजय पाटील यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या शक्‍यतांची चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली आणि मुंबईहून तसे संकेतही मिळू लागल्याने तालुक्‍यातील भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. सध्या काकांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहेच पण केंद्रीय मंत्रिपदाची ही लॉटरी लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मागील पाच वर्षांत मंत्रिपदाची आलेली संधी थोडक्‍यात हुकली होती. ऐनवेळी सुभाष भामरे यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्या गळ्यात संरक्षण राज्य मंत्रिपदाची माळ पडली होती. यावेळी पुन्हा महाराष्ट्रातून संधी मिळू शकणाऱ्यामध्ये संजयकाकांचे नाव पुढे येऊ लागले आहे. याशिवाय विटा-खानापूर भागातील उत्तर भारतात असलेले गलई व्यावसायिक दिल्लीत एकत्र येऊ लागले आहेत. त्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यापासून जल्लोषाची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्‍याचे लक्ष 30 मे कडे लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com