मुख्यमंत्र्यांच्या गाडीतली 'लिफ्ट' रणजित पाटलांना मंत्रीपदापर्यंत नेणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोला जिल्हा दौरा केला. अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथून त्यांच्या गाडीत पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांना 'लिफ्ट'देत पुढील दौरा संपेपर्यंत सोबत ठेवले. या प्रसंगाने पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर जाताना मुख्यमंत्र्यांनी डॉ. रणजित पाटील यांना दिलेली 'लिफ्ट' आठवली.
Ranjit Patil - Devendra Fadanavis
Ranjit Patil - Devendra Fadanavis

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोला जिल्हा दौरा केला. अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथून त्यांच्या गाडीत पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांना 'लिफ्ट'देत पुढील दौरा संपेपर्यंत सोबत ठेवले. या प्रसंगाने पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर जाताना मुख्यमंत्र्यांनी डॉ. रणजित पाटील यांना दिलेली 'लिफ्ट' आठवली. 

त्यावेळची 'लिफ्ट' थेट राज्यमंत्री पदापर्यंत घेवून गेली होता. आता पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान झाले तर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेली 'लिफ्ट' डॉ. पाटील यांच्यासाठी भाग्यकारक ठरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजप-शिवसेना युतीचे सरकार २०१४ मध्ये स्थापन झाले होते. त्यावेळी प्रथमच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजतिलक झाला. मंत्रिमंडळाचे गठण सुरू होते. त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना तातडीने राज्याचा दौरा करावा लागला. ते हेलिकॉप्टरने अमरावती येथे आले. तेथून त्यांना पुढे बुलडाणा दौऱ्यावर जावयाचे होते. त्यासाठी त्यांनी अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.रणजित पाटील यांना खास अमरावतीला बोलावून घेतले. तेथून पुढे ते त्यांना हेलिकॉप्टरमध्ये सोबत घेवून गेले होते. पुढे मंत्रिमंडळाची घोषणा झाली तेव्हा डॉ. पाटील यांच्याकडे राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. हेलिकाॅप्टरमधील पाच वर्षांपूर्वीच्या त्या 'लिफ्ट'ने डॉ. पाटील यांचे भाग्य उजाळले. आता पुन्हा पाच वर्षांनंतर अशीच 'लिफ्ट’' मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डॉ. पाटील यांना दिली आहे. त्यामुळे पुन्हा मंत्रिपदाचा योगायोग जुळून येणार का, अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अंतर्गत वाद ठरू शकतो अडथळा
डॉ. रणजित पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजपमध्ये अकोला जिल्ह्यात दोन गट पडले आहे. एक गट डॉ. पाटील यांचा तर दुसरा गट केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा आहे. दोन्ही गटातील वाद मागिल पाच वर्षांत विकोपाला गेला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही या वादाचे पडसाद जिल्ह्यात दिसून आले होते. डॉ. पाटील यांचे निकटवर्तीय असलेले नगरसेवक व माजी जिल्हा परिषद सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णयापर्यंत हा वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशात हा वाद सर्वांत मोठा अडथळा ठरू शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com