अन्याय होतोय तर भाजपत का थांबलाय? नाराज नेत्यांना अनिल गोटेंचा सवाल 

 अन्याय होतोय तर भाजपत का थांबलाय? नाराज नेत्यांना अनिल गोटेंचा सवाल 

पुणे-"ज्यांना आपल्यावर भाजपमध्ये अन्याय झाला असं वाटतय त्यांनी भाजपमधून बाहेर पडावे.मी पक्षातील चुकीच्या गोष्टीवर बोलत होतो तेव्हा हे गप्प होते.आता बोलायला लागले आहेत. अन्याय होतोय तर पक्षात का थांबलाय ?"असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर नाराज असलेल्या नेत्यांना विचारला आहे. 

भाजपमध्ये सुरू असलेल्या घडामोडीवर त्यांनी सरकारनामाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

"माझ्या आत्मसन्मानाला जेव्हा ठेच लागली तेव्हा मी लगेच पक्ष सोडला,आमदारकीचा राजीनामा दिला. मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पक्षात जे काही चुकीच सुरू होत त्यावर आवाज उठवला. पण तेव्हा कोणीही काही बोलले नाही. मी एकटाच बोलत होतो."असे गोटे म्हणाले. 

"आता ज्यांना पक्षात अन्याय होतोय अस वाटतय ते पक्षात का थांबले आहेत.पक्षात ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनी ताबडतोब पक्ष सोडावा.",असा सल्ला त्यांनी भाजपमधील नाराजांना दिला. 

"नाराजांपैकी मी कोणालाही भेटलो नाही.आणि त्यांच्यापैकी कोणाला मी संपर्क केला नाही मात्र त्यांनी स्वतःचा आत्मसन्मान जपावा."असे आवाहन त्यांनी केले. 
"गेल्या पाच वर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. त्यांनी धनगर समाजाला केवळ आश्वासनाची गाजरे दिली."असेही ते धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलताना म्हणाले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com