हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय `या कारणांमुळे` जाहीर केला नाही....

हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काॅंग्रेसवर चिडून आहेत. त्यामुळे ते काॅंग्रेस सोडून भाजपात जातील, अशी अटकळ बांधली जात होती. आज झालेल्या मेळाव्यात तशी घोषणा अपेक्षित होती. मात्र त्यांनी ते टाळले. काय आहेत, त्यामागची कारणे?
हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय  `या कारणांमुळे` जाहीर केला नाही....

पुणे : भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे शब्दाला जागणारे होते. आपल्या शेजारच्या वृत्तीसारखे नव्हते. राष्ट्रवादीने माझा उपयोग करून घेतला. मला फसवलं गेलं. अपमान केला गेला. यापुढे माझा आक्रमकपणा बघाल, अशा शब्दांत काॅंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला. पण कोणताही राजकीय निर्णय़ त्यांनी जाहीर केला नाही. 

पुढं काय करायचं, असं हर्षवर्धन यांनी समोरच्या गर्दीला विचारल्यानंतर `भाजप`, असे उत्तर आले. लोकांच्या मनात आहे, तेच होईल काळजी करू नका, अशी घोषणा त्यांनी येथे केली. तुमच्या भावनेचा शंभर टक्के आदर करू, असे त्यांनी सांगितले. स्वतः भाजप प्रवेशाची अधिकृत प्रवेशाची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. पण राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले.

इंदापूरची जागा ही त्यांच्यासाठी न सोडता राष्ट्रवादी स्वतःकडेच ठेवणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी काल निर्धार मेळावा घेतला. त्यात राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. भाजपकडून अद्याप पाटील यांना ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने पाटील यांनी घोषणा केली नसावी, असे बोलले जात आहे.

आपला मेळावा घेण्यापूर्वी त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचीही भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीतच हर्षवर्धन यांनी भाजपला मदत करावी, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्या वेळी झालेल्या इंदापूर येथील मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन यांना किती दिवस बारामतीचे पाणी भरणार, अशा आशयाचा सवाल विचारला होता. मात्र पाटील यांनी ही जागा राष्ट्रवादी, आपल्यासाठी सोडेल, या हेतून आघाडी धर्म पाळला. मात्र कालच झालेल्या चर्चेनुसार ही जागा राष्ट्रवादी स्वतःकडेच ठेवणार असून पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर आणि जुन्नर अशा तीन जागा काॅंग्रेसला देऊ केल्या आहेत. एकीकडे भाजप अद्याप ग्रीन सिग्नल देत नाही, काॅंग्रेस साथ देत नाही आणि राष्ट्रवादीची अडवणूक थांबत नाही, अशा कात्रीत हर्षवर्धन अडकले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन यांनी भाजपचा सल्ला धुडकावला. त्याचे उट्टे आता भाजप नेते काढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाविषयी त्या पक्षाचा नेता काहीच बोलत नाही. उलट त्यांच्याकडे भाजप दुर्लक्ष करत असल्याचे चित्र या नेत्यांनी तयार केले आहे.

भाजप प्रवेश करण्याआधी पाटील यांना काही बाबींची खात्री हवी आहे. इंदापूरची जागा ही परंपरेने युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे मानली जाते. ही जागा शिवसेनेकडे गेली तर मग भाजपमध्ये जाऊन काय उपयोग, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. इंदापुरात दलित आणि मुस्लिम मते मोठ्या संख्येने आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर ही मते आपल्याला मिळतील काय, याची खात्री त्यांना अद्याप नाही. त्यामुळे भाजपपेक्षा अपक्ष लढून जास्त मते मिळण्याची शक्यता त्यांना वाटते. 1995, 1999 अशा दोनही निवडणुका त्यांना इंदापूर विकास आघाडी म्हणूनच लढविल्या होत्या. त्यामुळे विकास आघाडीचा प्रयोग पाटील पुन्हा करण्याची जास्त शक्यता आहे. 

या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ``राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा नियोजनात नव्हती; मग इंदापुरात कशी आल?राष्ट्रवादीने तुमचं आमचं वाटोळं केलं कुणाचीही भीती नाही. ही लढाई आता आरपारची आहे. वाघ म्हटलं तरी खातंय आणि वाघोबा म्हटलं तरी खातंय. लबाड आणि फसवेगिरी करणारांसाठी आता काम करायचं नाही. लोकसभेसाठी मला भाजपने आग्रह केला होता. पण मी राष्ट्रवादीला साथ दिली. राज्यात देशात काय हवा चाललीय, वेगळं सांगायला नको. राज्यात देशात काय हवा चाललीय, वेगळं सांगायला नको. राज्यात देशात काय हवा चाललीय, वेगळं सांगायला नको, असे म्हणत आपला मार्ग सांगितला. प्रत्यक्षात निर्णय घेतला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com