बीड : राज्यात आता आपल्या विचाराचे सरकार आले आहे. चाणक्य कोण हे शरद पवारांनी देशाला दाखवून दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मी आणि शरद पवार बीड जिल्ह्यात आलो होतो. निकाल मनासारखा लागला नाही. लोकांनी दिलेला निकाल आम्ही स्विकारला. दुसऱ्याच दिवशीपासून शरद पवारांनी सातारा ते बीड असा दौरा केला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळाशी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन सरकारकडे मांडल्या.
श्री. पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, सभापती जयसिंह सोळंके उपस्थित होते.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांनी शरद पवारांवर प्रेम दाखवले त्यात बीडचा क्रमांक वरचा आहे. चार आमदार निवडून दिले. शरद पवारांच्या पुढाकाराने दुष्काळी लोकांच्या अडचणी तत्कालीन सरकार पर्यंत पोचवल्या. प्रत्येक लोकापर्यंत पाणी पुरवण्याचे काम प्रशासनाचे असताना राजकारणाचा विचार न करता पस्तीस पिण्याचे टँकर या भागात सुरू केल्याचे रोहित पवार म्हणाले. लोक संकटात असताना मदत न करता लोकांच्या जीवनाबरोबर खेळण्याचे राजकारण आम्हाला शिकवले नाही. शरद पवारांना जेंव्हा ईडीची भीती दाखवली तेंव्हा मात्र वातावरण पूर्णपणे बदलल्याचे रोहित पवार म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.